Marathi News> मुंबई
Advertisement

Gunratna Sadavarte : विश्वास नांगरे पाटील, अजित पवार यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांचा खळबळजनक आरोप

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला होताय यावरुन महाराष्ट्रात खळबळ माजली असतानाच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Gunratna Sadavarte : विश्वास नांगरे पाटील, अजित पवार यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांचा खळबळजनक आरोप

Gunratna Sadavarte On Mahavikas Aghadi : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.  महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी देखील खळबळजनक आरोप केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil), अजित पवार (Ajit Pawar) यांनी नावे घेतली आहेत. 

दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा कट रचल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात  पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून माझ्याकडून आणखी काही वदवून घेण्याचा प्रयत्न केला असा दावा देखील सदावर्ते यांनी केला आहे. 

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचा-यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात आपल्याला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान डीसीपी निलोत्पलांनी देवेंद्र फडणवीसांविषयीच प्रश्न विचारले. हे प्रश्न मध्यरात्रीच विचारले गेले असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.  

महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कट रचला गेला. या बैठकीला संजय पांडे उपस्थित होते. या कटात आरएसएस आणि फडणवीस यांनाच अडकवायचं होतं, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

वळसे पाटील, अजित पवार, नांगरे पाटलांची नार्को टेस्ट करा. देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा कट कसा रचला गेला? मला तुरुंगात का टाकले यासर्वांचा खुलासा नोर्को टेस्टनंतर होईल असेही सदावर्ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर काय आरोप केलाय? 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा कट रचला गेला होता असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मला कटात अडकवण्यास सांगितले होते असा आरोप फडणवीस यांनी केला होता. 

Read More