Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वानराला मारहाण प्रकरणी वनविभागाने तिघांना घेतले ताब्यात

वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील कु-हा गावातील ३ युवकांना वानराच्या मृत्यू प्रकरणी वनविभागानं ताब्यात घेतलंय.

वानराला मारहाण प्रकरणी वनविभागाने तिघांना घेतले ताब्यात

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोडमधील कु-हा गावातील ३ युवकांना वानराच्या मृत्यू प्रकरणी वनविभागानं ताब्यात घेतलंय.

तीन तरुणांना घेतलं ताब्यात

पवन बांगर, पवन राठोड आणि समिर शाह अशी त्याब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.

झाडाला उलटं टांगून चपलेनं मारहाण

कुऱ्हा गावात जखमी वानराला लाठीनं बेदम मारहाण करून जीवे मारलं होतं. वानराला मारल्यानंतर हा पवन बांगर इथेच थांबला नाही तर वानराच्या मृत्युनंतरही त्याला झाडाला उलटं टांगून चपलेनं मारहाण केली.

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

विशेष बाब म्हणजे या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीकरण करून इतर व्हाट्सअॅप ग्रुपवर त्यानं व्हायरल सुद्धा केला होता.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Read More