Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

भारती विद्यापीठचे २ विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी मुळशी धरणात बुडाले

एमबीएचे विद्यार्थी पिकनिकसाठी आले होते.

भारती विद्यापीठचे २ विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी मुळशी धरणात बुडाले

पुणे : भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले आहेत. या मध्ये दोन विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. आज सकाळी सात वाजता मुळशी धरणात वळणे येथे ही घटना घडली. तिनही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले आहेत. 

भारती विद्यापीठात एमबीए करणारे १० विद्यार्थी मुळशी धरण येथे सहलीसाठी आले होते. ज्यामध्ये दिल्लीची संगीता नेगी, वय २२, पटनाचा शुभम सिन्हा, वय २२, आणि उत्तर प्रदेशचा शिव कुमार, वय २२ यांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Read More