Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पावसामुळे अंत्यविधी रखडला, स्मशानभूमी नसल्यामुळे मोठी अडचण

मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले 

पावसामुळे अंत्यविधी रखडला, स्मशानभूमी नसल्यामुळे मोठी अडचण

शशिकांत पाटील, झी मीडियास लातूर : लातूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका एका मृतदेहालाही बसलाय. निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रावण रंगराव सूर्यवंशी हा ७६ वर्षीय इसमाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. मात्र काल सायंकाळपासून निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात गावात स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले आहेत. 

त्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अंत्यविधी करावा तरी कसा प्रश्न नातेवाईक आणि ग्रामस्थांना पडला आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी ११३ टक्के इतका पाऊस झालाय. तर कालपासून निलंगा तालुक्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

दरम्यान याविषयी अद्याप ग्रामस्थांनी कसल्याही प्रकारची तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप हा विषय आपणास माहीत नसून याविषयी गटविकास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देश तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितलं आहे.

तसेच सायंकाळच्या सुमारास मृतदेहावर अंत्यविधी उरकले असल्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सांगितलं.

Read More