Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

शेळ्या चारण्याच्या वादातून दंगलीचा गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात शेतात शेळ्या चारण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन अनेकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

शेळ्या चारण्याच्या वादातून दंगलीचा गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात शेतात शेळ्या चारण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन अनेकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

यामुळं संतप्त महिलांनी रावेर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. पोलिसांनी निरपराध ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत महिलांनी पोलिसांना याबाबत जाब विचारला. 

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल याबाबतचे आश्वासन मिळाल्यानंतर महिलांनी आंदोलन मागं घेतलं. 

Read More