Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

विदर्भातील शेतक-यांसाठी रामदेव बाबांची महत्वपूर्ण घोषणा

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित शेतकरी मेळाव्यात योगगुरु बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.  

विदर्भातील शेतक-यांसाठी रामदेव बाबांची महत्वपूर्ण घोषणा

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आयोजित शेतकरी मेळाव्यात योगगुरु बाबा रामदेव यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.  

शेतक-यांना दिला हा सल्ला

पूर्व विदर्भातील शेतक-यांनी कोरफड लागवड करावी, ही सर्व कोरफड पतंजली विकत घेणार असून एका एकरातून किमान एक लाखांच्या उत्पन्नाची हमी शेतक-यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना कोरफडीच्या माध्यमातून पुढच्या ५ वर्षात ५००० कोटी रुपये वाटणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

नीरव मोदीचाही समाचार

मी केवळ एकाच मोदींना ओळखतो असे विधान करणारे योग गुरु बाबा रामदेव यांनी नीरव मोदीचा समाचार घेतला. दुसरा मोदी पैसे घेऊन परदेशात पळून जातो, असे रामदेव यांनी म्हटलेय.

Read More