Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पाणीप्रश्नावरुन महापालिकेत राडा, जलअभियंत्यावर ओतलं पाणी

अधिकाऱ्यांवर फायली भिरकावल्या

पाणीप्रश्नावरुन महापालिकेत राडा, जलअभियंत्यावर ओतलं पाणी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सभेत पाणी प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला आहे. नगरसेवक नियाज खान यांनी जल अभियंते सुरेश कुलकर्णी यांच्या अंगावर पाणी ओतलं. प्रा. जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांवर फायली भिरकावल्या. शहरातील पाणीप्रश्नावरून नगरसेवक आक्रमक झाले होते. 

नगरसेवकांनी पाणीप्रश्नी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी गॅलरीत घागर घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदवला. गेल्या पंधरा दिवसांपासून आळ्यामिश्रित पाणी नागरिकांना येत आहे. पाणी फेकल्याबद्दल सभागृहातर्फे माफी मागत प्रा. जयंत पाटील यांनी आयुक्तांच्या वर्तनाचा जाहीर निषेध केला. 

Read More