Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अनधिकृत फरसाण निर्मिती कारखान्याची मनसेकडून तोडफोड

अनधिकृत फरसाण निर्मिती कारखान्यात तोडफोड करत मनसेने हा कारखाना बंद पाडलाय.

अनधिकृत फरसाण निर्मिती कारखान्याची मनसेकडून तोडफोड

अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीतील अनधिकृत फरसाण निर्मिती कारखान्यात तोडफोड करत मनसेने हा कारखाना बंद पाडलाय. एमआय़डीसीत एका प्लॉटवर पत्र्याचा शेड उभारत गलिच्छ ठिकाणी निकृष्ट दर्जाचे शेकडो किलो फरसाण तयार करण्यात येत असल्याची बातमी झी २४ तासने प्रसारीत केली होती. उंदीर, सरडे, माशांचा वावर असलेल्या ठिकाणी हे फरसाण तयार करत अंबरनाथ, बदलापूर आणि इतर शहरातील नागरीकांना  विकरण्यात येत होते . यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडला गेला होता. हेच वृत्त झी २४ तासने प्रसारित केल्यानंतर मनसेने या ठिकाणी तोडफोड करत कारखाना बंद पाडलाय.

Read More