Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: एसआयटी परशुराम वाघमारेचा ताबा घेणार

...

गोविंद पानसरे हत्या प्रकरण: एसआयटी परशुराम वाघमारेचा ताबा घेणार

कोल्हापूर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी परशुराम वाघमारे याचा ताबा महाराष्ट्र एस.आय.टी घेणार आहे. गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी आणि गोविंद पानसरे यांची एकाच पिस्तूलने हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र एसआयटीच्या हालचाली वाढल्या आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकणी वाघमारे याची चौकशी करण्यासाठी एसआयटीचे पथक बंगळुरुला जाणार आहे.

कोण आहे आरोपी परशुराम वाघमारे?

पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या प्रकरणी परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. अटक झालेल्या परशुराम वाघमारे यानेच हत्या केल्याचे विशेष तपास पथकाने म्हटलं आहे. गौरी लंकेश तसेच ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ लेखक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकानं म्हटले आहे. मात्र हे पिस्तुल अजून पथकाच्या हाती लागलेलं नाही. .

ज्या टोळीसाठी ही हत्या करण्यात आली त्या टोळीची पाळमुळं जवळपास पाच राज्यात पसरल्याचं या पथकातल्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या टोळीला कोणतंही नाव देण्यात आलेलं नाही. उजव्या विचारधारेसाठी ही संघटना काम करते. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या पाच राज्यात या टोळीची पाळमूळं आहेत. या टोळीत महाराष्ट्रातल्या हिंदू जागृती समिती आणि सनातन संस्थेची माणसं भरती होत असली तरी या दोन संस्थांचा हत्याप्रकरणात थेट सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी दिसत नसल्याचं एसआयटीने म्हटलं आहे.

ज्या दिवशी गौरी लंकेशची हत्या झाली; त्याच दिवशी परशुराम वाघमारे याला शस्त्र देण्यात आलं होतं. हत्या झाल्यानंतर परशुरामकडून शस्त्र तात्काळ काढून घेण्यात आलं. परशुराम हा श्रीराम सेनेचाच कार्यकर्ता असल्याची माहिती एसआयटीनं दिली आहे.

Read More