Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

जेएनयुतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे २६/११ ची आठवण झाली- मुख्यमंत्री

युवकांच्या मनात अस्थिरता असून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

जेएनयुतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे २६/११ ची आठवण झाली- मुख्यमंत्री
मुंबई : जेएनयुतील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यामुळे २६/११ ची आठवण झाली असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  देशभरातील युवकांच्या मनात अस्थिरता असून त्यांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.. जेएनयूत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारला हा टोला लगावला आहे.आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुसरुन युवकांना विश्वासात घ्यायला हवे. युवक हे त्यांच्या वसतीगृहात होणार असतील तर ते गंभीर आहे. महाराष्ट्रात असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित आहात असा विश्वास त्यांनी युवकांना दिला आहे.
 

भित्रे होते म्हणूनच बुरखे घालून हल्ले केले अशी टीका त्यांनी हल्लेखोरांवर केले. जे आरोपी आहेत त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी असे ते म्हणाले. देशातील वातावरणामुळे विरोध होणारच असा टोला देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला. जेएनयू हल्ला प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असल्याचे ते म्हणाले. जेएनयू हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ देशभरात तरुणांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. मी पूर्णपणे या विद्यार्थ्यांसोबत आहे. महाराष्ट्रात कोणीही काळजी करु नका असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
Read More