Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

प्रेम प्रकरणाची माहिती देणाऱ्या पान टपरी चालकाची हत्या, तिघांना अटक

डोंबिवली शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  

प्रेम प्रकरणाची माहिती देणाऱ्या पान टपरी चालकाची हत्या, तिघांना अटक

डोंबिवली : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पान टपरी चालकाने प्रेम प्रकरणाची माहिती दिल्याने त्याची हत्या करण्यात आली. पान टपरी चालक राकेश यादव यांच्या हत्येप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी प्रियकारासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. गणेश भोईर, यश जाधव, रवी खिल्लारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव परिसरात काल पहाटे या परिसरात राहणारे राकेश यादव याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. राकेश मोठा गाव परिसरात पान टपरी चालवत होता. त्याच्या एका मित्राच्या मुलीसोबत गणेश भोईर या तरुणाचे प्रेम संबंध होते. याची माहिती राकेशला मिळाली त्याने ही बाब मुलीच्या वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी मुलीला आणि तिच्या आईला गावाला पाठवून दिले. राकेशमुळे आपली प्रेयसी दुरावल्याने गणेश भोईरला राकेशचा राग आला. त्याचा काटा काढण्याचे त्याने ठरविले.

अखेर संधी साधून गणेश भोईर याने आपल्या दोन साथीदारांसह पोहोचला. यश जाधव, रवी खिल्लारे सोबत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राकेशला गाठले. यावेळी त्याने जाब विचारला. त्यानंतर त्याची हत्या केली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गणेश भोईर, यश जाधव, रवी खिल्लारे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या प्रियकराने प्रेम संबंध असल्याची माहिती दिली. तसेच पान टपरी चालकाची हत्या केल्याचे सांगितले, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

Read More