Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचं वैभव लुटलंय, नाशकातून उद्धव ठाकरेंचा घणाघात

Nashik Uddhav Thackeray: एकीकडे मुंबई पंतप्रधान मोदींची भव्य रॅली सुरु असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार निशाणा साधला. नाशिकमध्ये सभेतील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.  मोदी, शहांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. मोदींची मणिपूरमध्ये जाण्याची हिम्मत नाही, असे ते म्हणाले. 

बाळासाहेबांनी शिवसेनेची जबाबदारी मला दिलीय. मी तुमच्या सर्वांची लढाई लढतोय, असे ठाकरे म्हणाले.  गंगा आईने मला दत्तक घेतलंय असे मोदी म्हणतात. मग कोरोनामध्ये प्रेत वाहत होती, तिथे सार्वजनिक चिता पेटल्या तेव्हा काय करत होतात? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

झोप झालेली नसली की लोक भ्रमिष्ट  होतात. पावटे आम्हाला नकली  म्हणतायत. तेलंगणामध्ये निवडणुकीत नकली संतान म्हणाले. भाजपाला पोर होत नाही म्हणून त्यांनी नकली संतान विकत घेतले. पटेल महाराजांचा जिरेटोप मोदींना  घालू नका त्यांची पात्रता नाही. दर्शन घेण्याची  सुद्धा पात्रतासुद्धा नाही, असा टोला त्यांनी लगावला. 

4 जूननंतर मोदी पंतप्रधान नसणार. आणखी 2 वर्षानंतर तुम्ही झोळी घेऊन निघून जालं तेव्हा भाजपची काय अवस्था होईल. 30 वर्ष दगफटका खाऊन आम्ही भाजपमध्ये नाही गेलो तर कॉंग्रेसमध्ये कसे जाणार? असा प्रश्न त्यांनी विचारला. इंडिया आघाडीकडे चेहरे आहेत. तुमच्यानंतर भाजपकडे चेहरा नाही. 5 जूनला अर्धा भाजप फुटणार, अशी भविष्यवाणी नाशकातून उद्धव ठाकरेंनी केली. छत्रपतींनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. सुरतेचे 2 बोके महाराष्ट्र लुटतायत. 2 लुटारुंनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटलंय. ते परत आणणार असल्याचे ठाकरे म्हणाले. बाळासाहेब असा उल्लेख करताय. हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करा, असे ते म्हणाले.

 

Read More