Maharashtra HSC 12th Board Result 2024 LIVE: वर्षभराचा अभ्यास आणि पदवी शिक्षणाच्या दिशेनं टाकलेलं एक पाऊल, या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीचा निकाल. आज (21 मे 2024) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं हा जाहीर करण्यात येईल. या निकालामध्ये विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध असेल, ज्याची प्रिंट विद्यार्थी काढू शकतील. निकालासंदर्भातले सर्वात वेगवान अपडेट्स आणि इतर सर्व माहिती एका क्लिकवर....
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आल्यानुसार अधिकृत आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी मागील वर्षाच्या तुलनेत निकालात 2.12 टक्क्यांची वाढ झाली. 0 टक्के निकाल लागलेल्या संस्था / महाविद्यालयांची संख्या 21, तर 100 टक्के निकाल लागलेली महाविद्यालयांची संख्या 2246 इतकी असल्याचं शिक्षम मंडळाकडून जाहीर करण्यात आलं.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं मंगळवार, दिनांक 21 मे 2024 रोजी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. शिक्षण मंडळाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला हा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता
अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत.
यंदाच्या वर्षी बारावीच्या निकालांमध्ये मुलींनीच बाजी मारली. बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण 95.4 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर, 91.60 टक्के मुलं उत्तीर्ण झाली.
यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीच्या परीक्षांसाठी 154 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांपैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालामध्ये यंदाच्या वर्षीसुद्धा कोकण विभागानं बाजी मारली असून, इथं एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 97.91 टक्के इतकी आहे. तर, सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून, इथं 91.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
12 वीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर. 9 विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली असून, यामध्ये 93 %विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
ऑनलाईन पद्धतीनं प्रात्यक्षित परीक्षांचे निकाल घेतल्यामुळं निकाल लवकर लावण्यास मदत झाल्याचं शिक्षण मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 271 भरारी पथकं सक्रीय होती. ज्यामुळं कॉपी आणि तत्सम प्रकार रोखता आला.
निकालानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेती प्रत हवी असल्यास आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करायचा झाल्यास http:// verification. mh- hsc. ac. in या संकेतस्थळाला भेट द्यावी. इथं विद्यार्थी स्वत: किंवा त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीनं अर्ज करू शकणार आहेत. गुणपडताळणी अर्थात रिचेकिंग आणि पुनर्मुल्यांकलनासाठीच्या महत्त्वाच्या तारखा आहेत, 22 मे ते 5 जून.
यंदाच्या वर्षी सीबीएसई आणि आयसीएसईच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढल्याचं लक्षात आलं होतं. जे पाहता आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडूनही घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये निकालाची टक्केवारी वाढते का, याकडेच अनेकांचं लक्ष आहे.
यंदाच्या वर्षी 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली. यामध्ये विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक 7,60,46 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामागोमाग कला शाखेसाठी 3, 81,226 आणि वाणिज्य शाखेसाठी 3, 29,905 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात 37,226 आणि आटीआयमध्ये 4750 विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org,
hsc.mahresults.org.in
राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 दरम्यान पार पडली. ज्यानंतर आता ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.