Breaking News Live Updates : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वर्तुळात विरोधकांपासून इतरत्र त्यांच्या वक्तव्याचीच चर्चा पाहायला मिळाली. राज्याच्या राजकारणासह समाजकारणातही अशा अनेक गोष्टी घडत असून, घडणार असून प्रत्येक लहानमोठ्या बातमीचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर...
हरियाणात विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, काय आहे कारण?
निवडणूक आयोगाने शनिवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलून 1 ऑक्टोबर ऐवजी 5 ऑक्टोबर केली आहे. निवडणूक निकालाच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 4 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र, आता 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. हरियाणामध्ये विधानसभेच्या 90 जागांवर एकाचवेळी मतदान होत आहे.
रुबिना फ्रांसिसने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने 5 पदके जिंकली आहेत. महिलांची 10 मीटर एयर पिस्टल (SH1)स्पर्धेत रुबिना फ्रांसिसने कांस्यपदक पटकावले आहे. नेमबाजीतील भारताचे हे चौथे पदक आहे. शेवटच्या दोन शॉट्समधील खराब गुणांमुळे रुबिनाचे रौप्यपदक हुकले.
राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान', मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
राज्यात आता 'हर घर दुर्गा अभियान' सुरु होणार आहे. राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. अशी घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या अभियानात वर्षभर ज्युदो, कराटे यांसारखे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेतल्या जाणार असून आयटीआयमध्ये वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे रिजेक्ट झालेले फॉर्म पुन्हा भरता येणार
लाकडी बहीण योजनेचे रिजेक्ट झालेले फॉर्म पुन्हा सप्टेंबर महिन्यात भरता येणार आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता हा नवरात्रीच्या दिवसांमध्ये दिला जाणार आहे. अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यलयात हजर राहण्याचे आदेश
स्वप्ना पाटकर यांना ईडी कार्यलयात तातडीने बोलावण्यात आले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. त्या अनुषंगाने आज त्यांना ईडी कार्यलयात बोलावले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मनीषा कायंदे देखील त्याच ठिकाणी त्यांची भेट घेणार आहेत.
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ ? पत्राचाळ जमीन घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांना बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी. पत्राचाळ प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा स्वप्ना पाटकर यांचा आरोप. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी अतिरिक्त संचालक (पश्चिम क्षेत्र), ईडी यांना लिहिलं पत्र.
पावसामुळे कांद्याचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची अवाक कमी झाली आहे. त्यामुळे एपीएमसी मध्ये 50 रुपये किलो पर्यंत कांद्याचे दर वाढले आहेत. तर भाजीपाला बाजारात याच कांद्याला ग्राहकांना 60 रुपये प्रति किलो मोजावे लागत आहेत. कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे व्यापार्यांनी साठवलेल्या कांद्यालाच दर मिळत आहे.
महा विकास आघाडीमध्ये मुंबईतील जागा वाटपासंदर्भात तिढा जवळपास सुटला असून, मुंबईतल्या 31 मतदारसंघाबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. आता फक्त 5 मतदारसंघात तिढा कायम असल्याची माहिती समोर येत आहे. कुर्ला, अणुशक्तीनगर, वर्सोवा, सायन आणि भायखळा या 5 मतदारसंघात अजूनही MVA मध्ये चर्चा सुरूच आहे. मुंबईत काही ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच आहे तर काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा जागावाटपाच्या बैठकीत हा तिढा सुटला जाण्याची शक्यता आहे.
Breaking News Live Updates : शिवरायांच्या पुतळ्याविषयी कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण, भांडवल करु नये; उदयनराजेंची प्रतिक्रिया
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटने बाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे यामध्ये त्यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे या घडलेल्या दुर्घटनेचे कारण कच्चा दुवे आणि निसर्गाची अवकृपा ही प्रमुख कारणे त्यांनी सांगितले असून कोणीही या घटनेचे स्वतःच्या लाभासाठी भांडवल करू नये. या घटनेत विशेष कोणाला लक्ष बनवणे टाळले पाहिजे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. आणि समुद्र तटीय निसर्ग नियमांचा आणि वातावरणाचा बदलाचा पुरेपूर अभ्यास करून छत्रपती शिवरायांचा प्रेरणा देणारा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा करावा असे प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
कोणत्याही गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाकडून आरोपीची ओळख परेड करण्यात येते त्यानुसार आता बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी अक्षय शिंदे यांची आता पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे, एसआयटीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता ,त्यानुसार आता न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याची ओळख ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे, सध्या अक्षय शिंदे हा तळोजा येथील न्यायालयीन कोठडीत आहे त्यामुळे आता येत्या एक ते दोन दिवसात जेलमध्ये अक्षय शिंदे यांची पीडित मुली समोर ओळख परेड करण्यात येणार आहे , पीडित अत्याचार प्रकरणांमध्ये कोणतेही त्रुटी राहू नये म्हणून ही ओळख परेड करण्यात येणार आहे.
केदारनाथ आणि गौचर दरम्यान भीमबलीजवळ हेलिकॉप्टर कोसळले आहे. वास्तविक, केस्ट्रेल हेलिकॉप्टर खराब झाले होते. त्याची दुरुस्ती करावी लागली. त्यामुळे एमआय-17 हेलिकॉप्टरने लिफ्ट केले जात होते. त्यानंतर वायर तुटल्याने केस्ट्रेल हेलिकॉप्टर खाली पडले. या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, एसडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्याचा शोध घेतला.
रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावर भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांनी यावेळी गळाभेट घेत एकत्र फोटोसेशनही केलं. राजकीय विरोधक विमानतळावर एकत्र आले आणि खांद्यावर हात ठेवत त्यांनी एकमेकांशी मारलेल्या गप्पा लक्ष वेधून गेल्या. मागील अनेक दिवसांपासून रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरू होते. रावसाहेब दानवे यांना लोकसभेत पाडल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला होता. तर, अब्दुल सत्तारांनाही पाडणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं.
अरबी समुद्रात तयार झाले 'असना' चक्रीवादळ तयार झालं असून, भारतीय किनाऱ्याला त्यापासून कोणताही धोका नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं. गुजरातमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र 'असना' चक्रीवादळात रूपांतरित झालं. 1976 नंतर ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रात पहिल्यांदाच चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे, ज्याला पाकिस्तानने 'असना' असं नाव दिलं आहे.
राज्यातील भाजपची सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून त्यांच्याच नेतृत्त्वात भाजप विधानसभा निवडणुका लढणार असल्याचे संकेत चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत. शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केलंय.
पालघरच्या नेहरोळी इथे एकाच घरात कुजलेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळलेत. आईसह मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. मूळचे गुजरातचे असलेले 75 वर्षाचे मुकुंद राठोड, 62 वर्षाच्या कंचन राठोड तर 52 वर्षांची मुलगी संगीता राठोड अशी मृतांची नावं असून ते गेल्या तीस वर्षापासून पालघरमध्ये वास्तव्याला होतें .गेल्या बारा दिवसांपासून हे कुटुंब कोणाच्याही संपर्कात नसल्याने धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी वाडा पोलीस अधिक तपास करतायत.
मांजरी मध्ये राहणारे दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं 195 ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं. दागिन्यांची पिशवी त्यांनी एक्टिवा गाडीच्या हुकला लटकवली होती. घरी परत जात असताना ते नातवंडांसाठी वडापाव घेण्यासाठी म्हणून हडपसर मधील रोहित वडेवाले समोर थांबले. दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले असताना त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या. तेवढ्यात एक अनोळखी इसम तिथे आला. तुमचे पैसे मागे पडल्याचं सांगून त्यानं जयश्री यांचं लक्ष विचलित केलं आणि गाडीच्या हुकला लटकवलेली दागिन्यांची पिशवी घेऊन तो पसार झाला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाला आहे. धामणे यांच्याकडील सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या आणि इतर दागिने मिळून जवळजवळ 195 ग्रॅम सोनं चोरीला गेल आहे. आजच्या तारखेला त्याची किंमत सुमारे 14 लाख रुपये आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हार्बर मार्गावर लोकल सेवा ठप्प. मानखुर्द ते वाशी दरम्यान लोकल थांबल्यास. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून लोकल एकाच जागेवर .ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड झाल्याने वाशी कडे जाणारी वाहतूक ठप्प. वाशी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड.
आज शहरात गणपती आगमन मिरवणुकांमुळे तसंच चिंतामणी आगमन मिरवणुकीमुळे लालबाग, परळ भागामध्ये शनिवारी आणि रविवारी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी लालबाग, परळ (डॉ. बी.ए. आंबेडकर रोडने) जाणे टाळावे. तर बॅ. नाथ पै, रफी किडवाई रोड, ना. म. जोशी, साने गुरुजी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन मुंबई वाहूतक पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे.
किल्ले राजकोट येथील दुर्घटने संदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली. पुतळा दुर्घटना घडली यासंदर्भात नक्की कारणं काय याची चौकशी ही समिती करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ही समिती गठीत करण्यात आली.
माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही... तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान नाना पटोलेंनी दिलंय. शिंदे पक्षाचे संजय शिरसाठ यांनी यावरुनच नाना पटोलेंना प्रत्युत्तर दिलं. सत्तेतून बाहेर पडा ऐवजी जाहीर फाशी द्या असं म्हणा, असा टोला शिरसाठांनी पटोलेंना लगावला.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.