Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

इंदुरीकर महाराज किर्तन करणं सोडणार ? पुढे हे काम करणार

किर्तनकार इंदुरीकर महाराज वादावर पहिल्यांदाच बोलले.

इंदुरीकर महाराज किर्तन करणं सोडणार ? पुढे हे काम करणार

शिर्डी : किर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या वादग्रस्त विधानावर अजूनही ठाम आहेत. आपण मुला-मुलीच्या जन्मासंदर्भात सम-विषम तारखेबाबत केलेलं विधान खरं असल्याचं इंदुरीकरांनी एका किर्तनात सांगितलंय. एवढंच नव्हे तर भागवत आणि ज्ञानेश्वरीतही हे सांगितल्याचा दावा इंदुरीकरांनी केला आहे. मात्र यावेळी त्यांनी सोशल मीडियावर चांगलंच तोंडसुख घेतलं. यू ट्यूबनं आपल्याला संपवण्याचा विडा उचलल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याबाबत सुरू असलेल्या बातम्यांमुळे उद्विगन् झालो असून आता किर्तन सोडून शेती करण्याचा विचार असल्याचं इंदुरीकरांनी एका किर्तनात सांगितलं.

'समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी ही भागवतातही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय. मी म्हणतोय हे खरं आहे. तरी लोकं म्हणताय याला ठेऊन द्या. तीन दिवसात अर्धा किलोने कमी झालो हो. आपली आता कपॅसिटी संपली. उद्या-परवाचा दिवस बघायचा, ठेऊन द्यायचा फेटा, आता शेतीच करायची. आता नको.असं देखील इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे.

'यूट्यूबवाले काड्या करतात. कॅमेरावाले मागे लागलेत. यूट्यूब चॅनेलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

Read More