Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

विषप्राशन केलेल्या सर्वांवर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

रायगड: राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे आहे. या प्रकरणामुळे देशभरात उडालेली खळबळ कायम असताना रायगड जिल्ह्यातही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे वृत्त आहे. अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींनी शीतपेयातून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. 

विषप्राशनाचे कारण अस्पष्ट

दरम्यान, विषप्राशन केलेल्या सर्वांवर अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्वांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती गंभीर असून, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, एकाच वेळी कुटुंबातील सर्वांनी विषप्राशन करण्याचे कारण काय ? याचे कारण मात्र समजू शकले नाही. 

दिल्लीतही ११ लोकांची आत्महत्या

दरम्यान, दिल्लीतील बुराडी येथेही एकाच कुटुंबातील ११ लोकांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. या लोकांनीही आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय याचे कारण स्पष्ठ होऊ शकले नाही.

Read More