Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात; 5 तरुण जागीच ठार

नशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. मनमाड-येवला राज्यमार्गावर  झालेल्या या अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. 

मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात; 5 तरुण जागीच ठार

Manmad Yeola Road Accident:  मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि स्विफ्ट कारची समोरा समोर धडक होवून हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच तरुण जागीच ठार झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 

अंकाई रेल्वे उड्डाण पुलावर हा झाला अपघात झाला. अपघातात 5 जण जागीच ठार झाले. भरधाव वेगात असलेल्या स्वीफ्ट कारने कंटनेनरला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती या अपघतात स्वीफ्ट कारचा चुराडा झाला आहे. स्थानिकांनी अपघात ग्रस्तांना कार मधून बाहेर काढले. मात्र, अपघात ऐवढा भीषण होता ही कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व जण नाशिक येथील तरुण आहेत. पोलिस मृत तरुणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

Read More