Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

मुलगी पळून गेल्याने वडील आणि भावाचा प्रियकराच्या कुटुंबावर हल्ला

औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

मुलगी पळून गेल्याने वडील आणि भावाचा प्रियकराच्या कुटुंबावर हल्ला

औरंगाबाद : प्रेमप्रकरणातून मुलीचे अपहरण केल्याच्या संशयावरून मुलीचा पिता आणि भावाने संशयित प्रियकराच्या धाकट्या भावाचा खून केला आहे, तर त्याच्या आई-वडिलांना गंभीर जखमी केले आहे. शनिवारी रात्री उशिरा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा या गावात ही घटना घडली आहे. 20 वर्षाची तरुणी या पीडित कुटुंबियांच्या मुलांसोबत पळून गेली आणि नेमका हाच राग धरून मुलीच्या वडिलांनी आणि भावाने हा हल्ला केला.

पळून गेलेल्या मुलाच्या लहान भावाचा तलवारीने वारकरून खून करण्यात आला आहे. तर आई-वडीलही गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे.

Read More