Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

पाच वर्षात शिवसेना आमदार फोडण्याचे प्रयत्न झाले- संजय राऊत

 गेली पाच वर्षे तसे प्रयत्न झाले पण शिवसेनेचे सर्व आमदार जागच्या जागी आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.

पाच वर्षात शिवसेना आमदार फोडण्याचे प्रयत्न झाले- संजय राऊत

मुंबई : युती असो वा नसो शिवसेनेतून कुणीही फुटून जाणार नाही. गेली पाच वर्षे तसे प्रयत्न झाले पण शिवसेनेचे सर्व आमदार जागच्या जागी आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. भाजपाला हा अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात त्यांनी यावेळ भाष्य केले. युती संदर्भात चर्चा सुरू असून ती पुढं सरकत आहे. येत्या काही तासांमध्ये याचा निकाल लागेल. प्रमुख लोक घासाघीस करत आहेत. प्रत्येक जागेवर चर्चा होत आहे. त्यामुळं आताच अंदाज बांधू नका असे राऊतांनी स्पष्ट केले.  २८८ जागांची वाटणी करणं हे फाळणीपेक्षाही कठीण असल्याचे ते म्हणाले. 

२०१४ ला भाजपा सरकारला पाठिंबा दिला नसता तर आज वेगळे चित्र असते. मातोश्रीबाहेर युती करण्यासाठी अनेकांना रांगा लावल्या असत्या. सत्तेत सहभागी असताना आम्ही समर्थ पर्याय होवू शकतो का ?, पूर्ण सत्ता मिळवण्यासाठी याचे चिंतन केले तर विरोधी पक्ष हा पर्याय असतो अशी टीपणीही त्यांनी यावेळी केली.  

शिवसेना साताऱ्याची जागा भाजपला देणार असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. उदयनराजेंनी लोकसभेपूर्वीच पक्ष सोडला असता तर बरे झाले असते. २०-२५ कोटींचा जो धुरळा उडाला तो उडाला नसता. परत पुन्हा सरकारी यंत्रणा, पैसे खर्च होणार आहेत. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Read More