Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

राज्यात दोन पक्ष फोडले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू; जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा

जयंत पाटील यांनी सभागृहात अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. राज्यात दोन पक्ष फुटले असून आणकी एक पक्ष फोडण्याची तयारी सुरु असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. 

राज्यात दोन पक्ष फोडले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू; जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : राज्यात दोन पक्ष फोडून झाले आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही जयंत पाटलांनी विधानसभेत केला. अशा उद्योगांमुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोपही जयंत पाटलांनी केला.  अंतिम आठवड्याच्या प्रस्तावरून अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये खडाजंगी झाली. विरोधक अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडयला विसरले असा आरोप सत्ताधा-यांनी केला. तर सरकार अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडत असल्यामुळे विरोधकांनी मांडला नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिलं. 

राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या चर्चेत जोरदार कलगीतुरा रंगला. फडतूस नव्हे स्वत:ला काडतूस म्हणणा-या गृहमंत्र्यांनी नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष द्यावं असा टोला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला. तर मी मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांचं नागपूरवर विशेष प्रेम असल्याचा प्रतिटोला फडणवीसांनी लगावला. 

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा

कोणी काय बोलायचं हे पहिला ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर त्यावर अजित पवार भडकले. हे धंदे आता बंद करा असा सल्ला त्यांनी जयंत पाटलांना दिला.  अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांची जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. त्यामध्ये एकेकाळी एकत्र असलेले अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांनी (Jayant Patil) एकमेकांचा समाचार घेतल्याने सभागृहाचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कुणी आधी बोलायचं ते ठरवा असा टोला जयंत पाटलांनी लगावल्यानंतर अजित पवार चांगलेच भडकले. आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोण बोलायचं ते आम्हाला माहिती आहे असं ते म्हणाले. तसेच विरोधकांच्या मुद्द्यावरून सभागृहात एक आणि बाहेर एक भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा असा सल्लाही त्यांनी दिला.  

नेमकं काय घडलं? 

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधक आज एकमेकांच्या आमनेसामने आल्याचं दिसून आलं. शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यानंतर जयंत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सभागृह संपलं नाही. एक तर दहा दिवसांचे अधिवेशन केलं आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असं हे बरोबर नाही. त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचं अधिवेशन घ्या आणि चर्चा करा.
 जयंत पाटलांच्य भाषणावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांशी चर्चा करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर जयंत पाटील म्हणाले की, तुमच्यात आधी ठरवा की कोण आधी बोलायचं ते. 

जयंत पाटलांवर अजित पवार भडकले

जयंत पाटलांच्या या टोल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. ते म्हणाले की, आमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. त्यामुळे कसं बोलायचं आम्हाला माहिती आहे. कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी उरला. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला होता, त्यावेळी विरोधी पक्षाला माहिती होतं की अधिवेशन आज संपणार आहे. त्यावेळी त्यांनी सांगायला पाहिजे होतं. सभागृहात एक बोलायचं आणि बाहेर एक बोलायचं हे धंदे बंद करा. विदर्भाच्याबद्दल उत्तर आलंच पाहिजे यासाठी आम्ही ठरवलं. त्यासाठी प्रवीण दरेकरांनी विदर्भाचा प्रस्ताव मांडला. अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम त्यांनी केलं. त्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. 

Read More