Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

अनैतिक संबंधांचा परिणाम; पती शेतात असताना घरी प्रियकर आला, एकांतात असताना घडलं भयंकर

Akola Latest News: अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहेय प्रियकराने विवाहित प्रेयसीचा गळा चिरुन खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अनैतिक संबंधांचा परिणाम; पती शेतात असताना घरी प्रियकर आला, एकांतात असताना घडलं भयंकर

Akola News Today: अनैतिक संबंध आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाण वाढत आहे. जस जसा काळ बदलतो आहे तशीच नात्यांची व्याख्याही बदलताना दिसतेय. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत आहे. अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. प्रियकराने विवाहित महिलेचा गळा चिरुन खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुका येथील माना येथे ही घटना घडली आहे. एका प्रियकराने विवाहित महिलेचा गळा चिरून खून केल्याची घटना घडली आहे. माना येथील मृत महिला अकोट तालुक्यातील लोहरी गावातील एका तरुणाच्या संपर्कात आली होती आणि त्यातूनच त्यांची ओळख झाली होती. महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी महिलेच्या घरात शिरला आणि दार बंद केलं. त्यावेळी दोघांमध्ये काही कारणांवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने महिलेच्या गळ्यावर आणि पायावर चाकूने सपासप वार केले. 

आरोपीने केलेल्या हल्ल्यात महिलेचा यात जागीच मृत्यू झाला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःही आपला गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात तो गंभीररित्या जखमी झालेल्या आरोपीचा अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून माना पोलीस अधिक तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर महिलेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. त्याचवेळी महिलेचा पती शेतात गेला होता. घरात ती एकटीच होती. हिच संधी साधून प्रियकराने तिला गाठले. मात्र, त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर प्रियकराने महिलेची हत्या केली आणि स्वतःवरही वार केले. 

नवी मुंबईतही प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राहणाऱ्या प्रियकराने घराजवळच राहणाऱ्या आपल्या प्रेयसीचा गळा आवळून हत्या करत स्वतः देखील रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी ही घटना घडली आहे. 19 वर्षीय वैष्णवी बाबर आणि 24 वर्षीय वैभव बुरुंगले यांच्यात मागील पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात सतत खटके उडत होते. याच वेळी वैभवच्या मनात संशयाने घर केले आणि मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात वैभवने वैष्णवीची हत्या करण्याचा कट रचला.

Read More