Marathi News> महाराष्ट्र
Advertisement

वर्धा जळीतकांडानंतर आणखी एक हादरवणारी घटना

घरात घुसून महिलेला पेटवलं 

वर्धा जळीतकांडानंतर आणखी एक हादरवणारी घटना

औरंगाबाद : सिल्लोडच्या अंधारी गावातील घटनेने सगळ्यांनाच सुन्न केलं आहे. गावातील एका महिलेला घरात घुसून पेटवण्यात आलं आहे. महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्यात आलं आहे. यामध्ये महिला 95 टक्के पेटली असून तिच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. महिलेवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच रॉकेल ओतलं आहे. किरकोळ वादातून शेजारील व्यक्तीने महिलेवर रॉकेल ओतलं आहे. बिअर बार चालकाने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 

हा प्रकार घडल्यानंतर आरोपीला तात्काळ परिसरातील व्यक्तींनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या घटनेत महिला 95 टक्के भाजली असून तिच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ घरगुती वादातून राग अनावर झाल्यामुळे ही घटना घडली. पण रागामुळे एवढ्या टोकाला पोहोचणं एका महिलेच्या जीवावर बेतलं असल्याचं समोर आलं आहे.

वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये तरुण शिक्षिकेला जाळणाच्या धक्कादायक प्रकार घडला असताना औरंगाबादमधील या घटनेने पुन्हा एकदा महिला सुरक्षित नसल्याचं अधोरेखित केलं आहे. वर्ध्यातील आरोपीला अटक करण्यात आली असून संतप्त नागरिकांनी आज हिंगणघाट बंदचा नारा दिला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान पीडित शिक्षिकेच्या तब्येतीची माहिती समोर आली आहे. 

Read More