Marathi News> भारत
Advertisement

Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट

Rain News : यावर्षी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. ऑक्टोबर महिन्यातही जोरदार पाऊस झाला. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद या राज्यात ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (IMD Rain Alert) नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडणार असल्याने (Weather Updates 12 November)थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Rain Alert: पुन्हा एकदा पावसाचा इशारा, जोरदार पावसाच्या शक्यतेने शाळा-कॉलेज बंद; हवामान विभागाचा अलर्ट

Rain Today Update: भारतीय हवामान खात्याने (IMD) आज एक अलर्ट (IMD Alert for Rain) जारी केला असून, देशातील काही राज्यांत मुसळधार पावसाचा  (Heavy Rainfall) इशारा दिला आहे. तर दुसरीकडे डोंगरावरील बर्फवृष्टीमुळे वातावरणात थंडी वाढली आहे. (Weather Forecast Today Update)देशातील काही राज्यांमध्ये पावसाळा पुन्हा एकदा परतण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  हवामान खात्याने (IMD) तामिळनाडूमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत अलर्ट जारी केला आहे. याशिवाय पर्वतांवर बर्फवृष्टी सुरु झाली असून, त्यामुळे उंचावरील भागात पारा झपाट्याने घसरण्यास सुरुवात झाली आहे. पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे सकाळपासूनच दिल्लीच्या वातावरणात थंडी जाणवत आहे. (अधिक वाचा - जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट)

या राज्यांत पावसाची शक्यता, शाळा बंद

तामिळनाडूची राजधानी चेन्नईसह राज्यातील किमान 26 जिल्ह्यांनी आज संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिल्याने राज्यभरातील शाळांना स्थगिती देण्यात आली आहे.आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचवेळी, तामिळनाडू व्यतिरिक्त, 12 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टी भागात, केरळ आणि माहेमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  (अधिक वाचा - जीवनात आचरणात आणा चाणक्य नीति; कधीही होणार नाही अपयशी )

यामुळे पाऊस कोसळतोय

दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर आणि तमिळनाडूच्या किनार्‍यालगतच्या ईशान्य श्रीलंकेला लागून असलेल्या काही भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे. अशा स्थितीत दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाने लोकांच्या अडचणी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

किनारी भागातील लोकांना अलर्ट

दरम्यान, तमिळनाडू आणि आसपासच्या मच्छिमारांना शुक्रवार 12 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश-तामिळनाडू-पुद्दुचेरी-श्रीलंका किनारपट्टी, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरीन क्षेत्रासह आणि नैऋत्य बंगाल आणि पश्चिम बंगालच्या बाजूने आणि त्याजवळील खाडीत, समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.  

दुसरीकडे, मच्छिमारांना 13 आणि 14 नोव्हेंबर दरम्यान आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि केरळचा किनारा, लक्षद्वीप परिसर, मालदीवच्या किनारपट्टीवर जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

दिल्लीत हवामान कसे असेल?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 12 नोव्हेंबर रोजी दिल्लीत किमान तापमान 14 अंशांच्या आसपास आणि कमाल तापमान 29 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD च्या अंदाजानुसार, 16 नोव्हेंबरपासून दिल्लीत चांगले धुके पडण्याची शक्यता आहे.

Read More