Marathi News> भारत
Advertisement

पत्रकार हत्या प्रकरणात आज राम रहिमचा फैसला

राम रहीमवर हत्येचा आरोप

पत्रकार हत्या प्रकरणात आज राम रहिमचा फैसला

नवी दिल्ली : पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी आज पंचकुलातील विशेष CBI कोर्टात सुनावणी होणार आहे. या प्रकरणात राम रहीम मुख्य आरोपी आहे. सध्या दोन महिला साध्वींवर अत्याचारप्रकरणी राम रहीम तुरुंगात आहे. राम रहिमला 20 वर्षाची शिक्षा झाली आहे. याआधी विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी दरम्यान या प्रकरणात आरोपी किशनलाल, निर्मल आणि कुलदीप यांना हजर करण्यात आलं. रोहतकच्या तुरुंगात बंद असलेल्या गुरमीत राम रहीमला व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे हजर करण्यात आलं. गुरमीतसह किशनलाल, निर्मल आणि कुलदीप यांच्यावर सिरसामधील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणात सीबीआयचे साक्षीदार पत्रकार आरके सेठी यांनी कोर्टात राम रहीमला फाशी देण्याची मागणी केली आहे. रामचंद्र छत्रपती यांची 21 नोव्हेंबर 2002 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. छत्रपतींनी साध्वींसोबत झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला होता. छत्रपती यांनी आपल्या वर्तमानपत्रात 'पूरा सच मध्ये या संबंधित एका साध्वीचं पत्र प्रकाशित केलं होतं. या प्रकरणात 2003 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. 2006 मध्ये हे प्रकरण सीबीआयला सोपवण्यात आलं होतं. छत्रपती यांचा पूत्र अंशुल छत्रपती यांचं म्हणणं आहे की, त्याच्या वडिलांना आज न्याय मिळणार आहे. अंशुल 16 वर्षांपासून वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी संघर्ष करत आहे.

आज कोर्टात सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. साध्वी यौन शोषण प्रकरणात राम रहीम दोषी ठरल्यानंतर पंचकुला आणि हरियाणामध्ये त्याच्या अनुयायांनी हिंसा घडवली होती. यामुळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

Read More