Marathi News> भारत
Advertisement

'फालतू पुढारी त्यांचे पक्ष अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही'

 महाराष्ट्रभर या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार  -  संजय राऊत  

'फालतू पुढारी त्यांचे पक्ष अरबी समुद्रात  बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही'

नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर ईडीची (ED) कारवाई झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांतच्या नावाखाली देशात सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर आज पुन्हा राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

हिंदुत्त्वाचे खोटे मुखवटे लावून लोकांना मुर्ख बनवण्याची काम आहेत ते मुखवटे गळून पडले आहेत.  विक्रांतच्या नावाने भ्रष्टाचारे करणारे हे फालतू पुढारी त्यांचे पक्ष अरबी समुद्रात  बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. 

शिवसेनेतर्फे राज्यसभा, लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रभर या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

INS विक्रांतच्या संदर्भात देशभावना, लोकभावना, सैनिकांचं बलिदान याच्याशी खेळ करुन  सैनिकांच्या बलिदानाचं बाजारात लिलाव करुन मातृभूमीचा लिलाव करुन भाजपचे महात्मा किरीट सोमय्या आणि त्याचे महापूत्र निल सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर काढलं. 

आणि इतकं होऊनही मला आश्चर्य वाटतं देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, राष्ट्रभक्तीची भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात, काल त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रद्रोही, देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली घेण्याचा प्रयत्न केला. तो बघून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉ हेगडेवार आणि आजचे आमचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल, 

तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा एक माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी झाली. आपलं स्वप्न आपण पूर्ण करु शकलो, त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैशे गोळा केले, लोकांना फसवूण, किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने, त्याचे पुरावे समोर आले आणि आता बोलताता पुरावे कुठे आहेत, संजय राऊत काहीही बोलतात. अरे तुम्ही काय बोलताय

काल फडणवीस म्हणाले आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे, तुम्ही काय कापलं ते सांगा. या देशासाठी तुमचं काय बलिदान आहे. उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करुन तुम्ही पैशे गोळा करता,  कधी राममंदिराच्या नावाने पैस गोळा करता. कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले,

आमच्या महाराष्ट्रात आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान त्याचा लिलाव करुन पैसे गोळा केले, अशा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही वकिली करताय, तुम्ही अभ्यास करुन बोलता असं म्हणता, मग आम्ही सांगतो तो पुरावा नाही का असा सवालही संजय राऊत  यांनी विचारला आहे. 

Read More