नवी दिल्ली : खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश मोदी सरकारने निर्माण केलेली अनेक संकटं आज झेलत आहे. त्यापैकीच गरजेचं नसलेलं खासगीकरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
आज देश मोदी सरकार-निर्मित कई आपदाएँ झेल रहा है जिनमें से एक है अनावश्यक निजीकरण।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 7, 2020
युवा नौकरी चाहते हैं पर मोदी सरकार PSUs का निजीकरण करके रोज़गार व जमा पूँजी नष्ट कर रही है।
फ़ायदा किसका?
बस चंद ‘मित्रों’ का विकास
जो हैं मोदी जी के ख़ास।
Stop Privatisation Save Govt Jobs.
देशातल्या तरुणाला नोकरी हवी आहे, पण मोदी सरकार सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन रोजगार आणि ठेवी भांडवल नष्ट करत आहे. फायदा कोणाचा? फक्त मोदींच्या खास मित्रांचा विकास करण्यासाठी हे होत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. खासगीकरण थांबवा आणि सरकारी नोकऱ्या वाचवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.