Marathi News> भारत
Advertisement

निर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली

दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे

निर्भया प्रकरणातील दोषीची पुनर्विचार याचिका फेटाळली

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका पहिल्याच दिवशी फेटाळली आहे. तीन आरोपींची पुनर्विचार याचिक याआधीच फेटाळण्यात आली होती. पटीयाला हाऊस न्यायालयात या दोषींना फाशी देण्यासंदर्भात याचिकेवर सुनावणी होणार आहे. निर्भयाच्या आई-वडीलांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. 

न्यायाधीष आर. भानुमती यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाकडे पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होती. दोषी अक्षयच्या वकिलांनी बाजू मांडण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ मागितला. याप्रकरणी सीबीआय तपास करण्याची मागणी होत होती पण सीबीआय तपास झाला नव्हता. पण रेयान इंटरनॅशनल केसमध्ये सीबीआय तपास झाला आणि बस कंडक्टरला सीबीआयने क्लीनचीट दिली. 

निर्दोषांना याप्रकरणी गोवले गेले होते. पण सीबीआयमुळे सत्य समोर आले. म्हणून आम्ही याप्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केल्याचे वकील एपी सिंह यांनी सांगितले. पण मुलीच्या मित्राने पैसे घेऊन माध्यमांमध्ये मुलाखत दिली. यामुळे केस प्रभावित झाल्याचे ते म्हणाले. 

निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत. विनय शर्माच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींकडून लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. अस असतानाच आता उत्तर प्रदेशहून तिहार जेलमध्ये दोन जल्लादांना बोलवण्यात आलं आहे.

मेरठमधील पवन जल्लाद यांना दिल्लीतील तिहार जेलमध्ये बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोषींना फाशी झाली पाहिजे. माझी पूर्ण तयारी असून जेव्हा तिहार जेलमध्ये बोलवण्यात येईल, त्यावेळी जाणार असल्याचं ते म्हणाले. फाशी देण्याआधी आरोपींची ट्रायल होणार असून त्यांचं वजन तपासलं जाणार आहे. त्यानंतर इतरही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याचं पवन यांनी सांगितलं.

फाशीची देण्याची प्रक्रिया

राष्ट्रपतींकडून दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांच्या आत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. राष्ट्रपतींचा निर्णय आल्यानंतर न्यायालय फाशी देण्यासाठी ब्लॅक वॉरंट जाहीर करतं. ज्यात फाशी देण्याची तारिख आणि वेळ नमूद करण्यात येते. त्या ब्लॅक वॉरंटची एक कॉपी आरोपीलाही दिली जाते. त्यानंतर आरोपीला त्याच्या कुटुंबियांना भेटण्याची मुभा दिली जाते.

फाशी देण्यावेळी त्या जागेवर जल्लादशिवाय केवळ चार लोक हजर असतात. जेल अधीक्षक, एसडीएम आणि दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात.

Read More