Marathi News> भारत
Advertisement

35 रुपयांच्या परताव्यासाठी 5 वर्षाची लढाई; IRCTC 3 लाख लोकांना पैसे करणार परत

कोटा, राजस्थान येथील अभियंता सुजित स्वामी यांनी रेल्वेकडून 35 रुपये परतावा मिळविण्यासाठी तब्बल 5 वर्षांची लढाई जिंकली. 35 रुपयांच्या परताव्यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्यामुळे तीन लाख लोकांना फायदा होणार आहे.

35 रुपयांच्या परताव्यासाठी 5 वर्षाची लढाई; IRCTC 3 लाख लोकांना पैसे करणार परत

कोटा :  अभियंता सुजित स्वामी यांनी मिळवलेल्या आरटीआयच्या उत्तरानुसार, रेल्वेने 2.98 लाख IRCTC वापरकर्त्यांना 2.43 कोटी रुपयांचा परतावा मंजूर केला आहे. जीएसटी करप्रणाली लागू होण्यापूर्वी त्यांचे तिकीट रद्द केल्यानंतर 35 रुपये सेवाकर म्हणून वसूल करण्यात आले. ते परत मिळवण्यासाठी चार सरकारी विभागांना पत्रे लिहिली तसेच 50 माहितीच्या अधिकाराचे अर्ज केले.

सुजित स्वामी यांनी दावा केला की भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने त्यांच्या आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की 2.98 लाख वापरकर्त्यांना प्रत्येक तिकिटावर 35 रुपयांच्या परताव्यासह एकूण 2.43 कोटी रुपये मिळतील.

जीएसटी लागू होण्यापूर्वी तिकीट बुक

पीटीआयशी बोलताना स्वामी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, जीएसटी कौन्सिल आणि अर्थमंत्र्यांना टॅग करून रिफंडची मागणी करणारे मी वारंवार केलेल्या ट्विटमुळे 2.98 लाख वापरकर्त्यांना परतावा मिळाला आहे. मंजुरी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

30 वर्षीय अभियंत्याने नवीन GST प्रणाली लागू झाल्याच्या एका दिवसानंतर 2 जुलै रोजी प्रवास करण्यासाठी एप्रिल 2017 मध्ये गोल्डन टेंपल मेलमध्ये आपल्या गावापासून नवी दिल्लीपर्यंतचे रेल्वे तिकीट बुक केले होते. परंतू काही कारणास्तव ते 765 रुपयांचे तिकीट रद्द केले होते.

 त्यानंतर त्यांना 65 ऐवजी 100 रुपयांच्या कपातीसह 665 रुपयांचा परतावा मिळाला. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होण्यापूर्वी त्यांनी तिकीट रद्द केले असले तरीही सेवा कर म्हणून त्यांच्याकडून अतिरिक्त 35 रुपये वसूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वामींनी रेल्वे आणि वित्त मंत्रालयाला आरटीआय प्रश्न पाठवून 35 रुपयांचा परतावा मिळवण्यासाठी लढा सुरू केला.

एका RTI उत्तरानुसार, IRCTC ने रेल्वे मंत्रालयाच्या व्यावसायिक परिपत्रक क्रमांक-43 चा हवाला दिला आहे की GST लागू होण्यापूर्वी बुक केलेल्या आणि GST लागू झाल्यानंतर रद्द केलेल्या तिकिटांच्या बुकिंगच्या वेळी आकारला जाणारा सेवा कर परत करण्यायोग्य नाही.

65 ऐवजी 100 रुपयांची वसूली

तिकीट रद्द करण्यासाठी 65 रुपयांऐवजी 100 रुपये आकारण्यात आले. 35 रुपये सेवा कर म्हणून वसूल करण्यात आला. सुजित स्वामी यांनी आरटीआयच्या उत्तरात पुढे सांगितले की, 1 जुलै 2017 पूर्वी बुक केलेल्या आणि रद्द केलेल्या तिकिटांसाठी, बुकिंगच्या वेळी आकारलेल्या सेवा कराची एकूण रक्कम परत केली जाईल.

2 रुपयांसाठी पुन्हा तीन वर्षे लढा 

IRCTC ने स्वामींच्या आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की 35 रुपयांची रक्कम परत केली जाईल. याबाबत सुजित स्वामी म्हणाले की, मला 1 मे 2019 रोजी माझ्या बँक खात्यात 33 रुपये मिळाले आणि 35 रुपयांच्या सेवा कराचे पूर्ण मूल्य म्हणून 2 रुपये वजा केले. आणि 2 रुपये परत मिळवण्यासाठी पुढील तीन वर्षे लढा चालू ठेवला. अखेर गेल्या आठवड्यात शुक्रवारी निकाल लागला.

तीन वर्षांनी दोन रुपये मिळाले

स्वामी यांच्या म्हणण्यानुसार, आयआरसीटीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की, रेल्वे बोर्डाने सर्व वापरकर्त्यांना (2.98 लाख) रुपये 35 परतावा मंजूर केला आहे. रिफंड जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व प्रवाशांना हळूहळू त्यांचे पैसे मिळतील. त्यानंतर त्याच दिवशी मला IRCTC कडून 2 रुपये परत करण्याबाबतचा एक मेल देखील आला, ज्यामध्ये बँक खात्याची पडताळणी करण्याची मागणी केली होती.

पीएम केअरमध्ये 535 रुपये दिले

त्यानंतरच्या आरटीआय उत्तरात म्हटले आहे की 2.98 लाख वापरकर्त्यांना प्रत्येक तिकिटावर 35 रुपयांच्या परताव्यासह 2.43 कोटी रक्कम परत केली जाईल. 

मी बँक खात्याचे तपशील पाठवले होते आणि सोमवारी मला 2 रुपये परत मिळाले. 

स्वामी म्हणाले की, सर्व वापरकर्त्यांना 35 रुपयांचा परतावा स्वीकारल्यानंतर आणि माझ्या पाच वर्षांच्या संघर्षातील 100 रुपये म्हणजेच 500 आणि 35 रुपये जोडल्यानंतर मी पंतप्रधान केअर फंडमध्ये 535 रुपये दान केले आहेत.

Read More