Marathi News> भारत
Advertisement

Indian Railways : रेल्वे प्रवास करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी, रात्री प्रवास करण्याचे नियम बदलले

Indian Railways : भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वे बदलत असलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे.  

Indian Railways :  रेल्वे प्रवास करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी, रात्री प्रवास करण्याचे नियम बदलले

मुंबई : Indian Railways : भारतीय रेल्वेकडून रेल्वेमध्ये प्रवास करण्याच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. रेल्वे बदलत असलेल्या नियमांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. यावेळी रेल्वेने रात्रीच्यावेळी प्रवाशांची ( Train Passenger) रात्रीची झोपमोड असल्याची तक्रार लक्षात घेऊन काही नियम केले आहेत. यानंतर रात्री प्रवाशांना आता त्रास सहन करावा लागणार नाही.

नवीन नियम तात्काळ लागू  

आमच्या सहयोगी वेबसाइट india.com ने  दिलेल्या बातमीनुसार, नवीन नियम तात्काळ लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार, आता तुमच्या आजूबाजूला कोणताही रेल्वे प्रवासी मोबाईलवर मोठ्याने बोलू शकणार नाही आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर रेल्वे अशा लोकांवर कारवाई करेल. प्रवाशांची झोप लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे कर्मचारी जबाबदार राहणार

नव्या नियमांतर्गत अशीही तरतूद आहे की, रेल्वेमधील प्रवाशाकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. सर्व झोनला हे नियम तातडीने लागू करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत.

या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त 

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेकदा प्रवासी शेजारच्या सीटवर उपस्थित असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलत असल्याची किंवा गाणी ऐकत असल्याची तक्रार करत असत. याशिवाय रात्रीच्या वेळी काही मंडळी जोरजोरात बोलत असल्याच्याही तक्रारी होत्या. रेल्वेचे स्कॉट किंवा मेंटेनन्स कर्मचारी गस्तीदरम्यान मोठ्या आवाजात बोलतात तेव्हाही अशी प्रकरणे निदर्शनास आली. त्यामुळे प्रवाशांची झोपमोड झाली आहे. रात्रीच्या वेळी दिवे लावण्यावरुन अनेकदा वाद होत होते.

आता रात्री 10 वाजताची ही मार्गदर्शक तत्त्वे  

- कोणताही प्रवासी मोठ्याने बोलणार नाही किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात संगीत ऐकणार नाही.
- रात्रीच्या वेळी सहप्रवाशाच्या झोपेचा त्रास होऊ नये म्हणून रात्रीचे दिवे सोडून इतर सर्व दिवे बंद करावे लागतात.
- ग्रुपमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत रेल्वेमध्ये बोलता येणार नाही. सहप्रवाशाच्या तक्रारीवर कारवाई करता येते.
- चेकिंग कर्मचारी, आरपीएफ, इलेक्ट्रिशियन, केटरिंग कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेने काम करतील.
- रेल्वे कर्मचारी वृद्ध, दिव्यांग आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिलांना तात्काळ मदत करतील.

Read More