Marathi News> भारत
Advertisement

ग्रुप डिस्कशनमध्ये प्रभाव पाडायचा असेल, तर 'या' टिप्स फॉलो करा

बऱ्याचदा अनेक लोकांसोबत असं घडतं की, ते आपला मुद्दा लोकांसमोर मांडू शकत नाहीत. मग त्यांचा मुद्दा कितीही चांगला असला तरी ते चार-चौघात आपली छाप सोडू शकत नाहीत.

ग्रुप डिस्कशनमध्ये प्रभाव पाडायचा असेल, तर 'या' टिप्स फॉलो करा

मुंबई : बऱ्याचदा अनेक लोकांसोबत असं घडतं की, ते आपला मुद्दा लोकांसमोर मांडू शकत नाहीत. मग त्यांचा मुद्दा कितीही चांगला असला तरी ते चार-चौघात आपली छाप सोडू शकत नाहीत. ज्यामुळे अनेकांचा कॉन्फिडन्स देखील कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही लोकांवर तुमची छाप सोडू शकाल. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जाणून घ्या.

बोलता समोरच्यांच्या डोळ्यात पाहा किंवा आय कॉन्टॅक्ट ठेवा

 जेव्हा तुम्ही लोकांमध्ये चर्चेत भाग घेता तेव्हा लक्षात ठेवा की, केवळ नियंत्रकाशी संपर्क साधण्या किंवा त्याच्याशी ऑय कॉन्टॅक्ट करण्याव्यतिरिक्त तुम्ही चर्चेत उपस्थित असलेल्या प्रत्येकाशी संपर्क ठेवा. जेव्हा तुम्ही हे कराल, तेव्हा ग्रुपमधील इतर लोकही तुमचे लक्षपूर्वक ऐकतील आणि तुम्ही तुमचा मुद्दा नीट समजून घेतील.

चालू घडामोडी वाचा

ग्रुप  डिस्कशनचे विषय बहुतांशी चालू घडामोडींशी संबंधित असतात. अशा परिस्थितीत तुम्ही चालू घडामोडींची माहिती ठेवली, तर तुमचे मुद्दे चांगले ठेवता येतील. असे केल्याने तुम्ही वस्तुस्थितीवर बोलू शकाल आणि तुमचा मुद्दा अधिक प्रभावी होईल. ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घेणाऱ्यांनी त्यांना कोणत्या विषयावर बोलायचे आहे याची माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या देहबोलीकडे लक्ष द्या

ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की, ग्रुप डिस्कशनमध्ये बोलताना देहबोली चांगली असली पाहिजे. संभाषणादरम्यान, देहबोलीवरून असे वाटू नये की ते इतरांचे मुद्दे ऐकून तुम्ही नाराज होऊन काहीतरी उत्तर देत आहात. जेव्हा तुम्ही गटचर्चेत चांगले बसता आणि तुमचा पोशाख ऑपिशियल असतो तेव्हा तुमची लोकांवर चांगली छाप पडते.

इतरांचे नीट ऐका

ग्रुप डिस्कशनमध्ये प्रभावी होण्यासाठी तुम्ही इतरांचे म्हणणे नीट ऐकणे महत्त्वाचे आहे. इतरांचे म्हणणे ऐकूनच तुम्ही तुमची बाजू मांडू शकाल. ग्रुप डिस्कशनमधील लोकांचे ऐकणे देखील कधीकधी अनेक लिंक्स देते, ज्यामुळे तुम्हाला पुढे आणि चांगले बोलण्यासाठी काही मुद्दे लक्षात येतात.

संयम राखा

इतर अनेक लोक सुद्धा ग्रुप डिस्कशनमध्ये आपले म्हणणे मांडत असतात. अशा परिस्थितीत तुम्ही या काळात संयम राखणे आणि इतरांच्या मध्ये बोलू नका हे महत्त्वाचे आहे. इतरांचा मुद्दा कापून तुम्ही वाईट छाप सोडू शकता. तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलणे पूर्ण करू दिलेलं बरं आणि मग तुमचा मुद्दा पुढे ठेवा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More