Marathi News> भारत
Advertisement

न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर हायअलर्ट

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

न्यू ईयरच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर हायअलर्ट

नई दिल्ली : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नागरिक उड्डान सुरक्षा ब्यूरोने दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा वाढवली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. लोकं सेलिब्रेशनमध्ये व्यस्त असतात. अशा वेळेस सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आलं आहे. बीसीएएसने विमान कंपन्यांना आणि राज्य पोलीस प्रमुखांना याबाबत अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी दहशवतवादी देशात घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा त्यांच्या प्रयत्नांना भारतीय सुरक्षा रक्षकांनी हाणून पाडलं आहे.

Read More