Marathi News> भारत
Advertisement

Husband and Wife Dispute : पराठ्यानं पोट भरण्याऐवजी गेला एकाचा जीव; पती-पत्नीच्या वादात सगळं उध्वस्त

पराठ्यामुळे नक्की असं काय झालं की एकाचा झाला मृत्यु, जाणून तुम्हालाही बसेल धक्का

Husband and Wife Dispute : पराठ्यानं पोट भरण्याऐवजी गेला एकाचा जीव; पती-पत्नीच्या वादात सगळं उध्वस्त

Husband and Wife Dispute Over Aloo Paratha : पती-पत्नीमध्ये भांडण होणं ही नवीन गोष्ट नाही. त्यांच्यातील भांडणं ही कधी मोठी असतात तर कधी कधी थोड्या वेळातच ती संपतात. पण काही भांडण मोठी होतात आणि ती जगासमोर येतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. पण यावेळी पती-पत्नीमध्ये ज्या गोष्टीमुळे भांडण झालं आहे त्याचं कारण ऐकूण तुम्हालाही धक्का बसणार आहे. (Viral News)  या भांडणातून पतीचा मृत्यु झाला. मात्र, त्यानंतर आणखी नवे खुलासे झाले. (Trending news) 

ही घटना उत्तर प्रदेशातील अलीगढची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव लक्ष्मण आहे, 7 वर्षांपूर्वी त्याचे लग्न बुलंदशहर येथील एका मुलीशी झाले होते. अलीकडेच पतीनं पत्नीला आलू पराठा खायला सांगितला, त्यानंतर या प्रकरणावरून वाद झाला. बटाट्याच्या पराठ्यावरून वाद इतका वाढला की दोघेही घर सोडून बाहेर निघाले. 

भावजयातील अवैध संबंधाचा आरोप

यानंतर काही वेळातच पतीचा मृतदेह सिव्हिल लाईन परिसरात रेल्वे रुळावर आढळून आला. मृतदेह सापडताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. मृताच्या नातेवाइकांनी पत्नीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून पत्नीने आपल्या मेव्हण्यासह पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. पत्नी आणि मेव्हण्यामध्ये अवैध संबंध असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केला आहे. 

हेही वाचा : Beauty with Brain : पोलीस अधिकारी की सौंदर्याची खाण? तिचा जबरदस्त डान्स पाहून मॉडेल, अभिनेत्रींनाही विसराल

दरम्यान, दुसरीकडे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे. नातेवाइकांनी सांगितले की, गुरुवारी रात्री पतीनं पत्नीकडे जेवणासाठी आलू पराठे करण्यास सांगितले होते. यामुळे पत्नी संतप्त झाली आणि नवऱ्याला शिवीगाळ करू लागली, त्यानंतर पती बाहेर गेला मात्र तिथेच त्याचा खून करण्यात आला.

Read More