Marathi News> भारत
Advertisement

दीड महिन्यात संपेल वॅक्सिन तुटवड्याचं संकट, सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

बर्‍याच राज्यांना कोरोना लसीच्या तुटीचा सामना करावा लागतोय

दीड महिन्यात संपेल वॅक्सिन तुटवड्याचं संकट, सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वॅक्सिन हेच कोरोनाव्हायरस विरूद्ध सर्वात मोठे शस्त्र मानले जातंय. सध्या 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसी दिली जात आहे. पण बर्‍याच राज्यांना कोरोना लसीच्या तुटीचा सामना करावा लागत आहे. आता लसीची कमतरता दूर करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलण्याची तयारी करत आहे.

कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार इतर कंपन्यांना कोवाक्सिन बनविण्याची परवानगी देण्याच्या तयारीत आहे.आम्ही यासाठी तयार आहोत आणि ही लस बनविणाऱ्या कंपन्यांशीही चर्चा करीत आहोत असे  केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मंडावीया म्हणाले.

मनसुख मांडवीया (Mansukh Mandaviya) यांनी एका विशेष संभाषणात सांगितले की, कोवाक्सिन ही भारतात तयार केलेली लस आहे. त्यामुळे त्याच्या उत्पादनात एपीआयची कोणतीही समस्या नाही. या संशोधनात सहाय्यक कंपन्या गरजेनुसार त्याचा पुरवठा करण्यास सक्षम आहेत. ते म्हणाले की कोणत्याही औषध किंवा लस उत्पादकाकडे त्यासाठी आवश्यक चौकट आणि संसाधने असतील तर त्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांना परवानगी देऊ.

कोरोना लसीची कमतरता दूर करण्यासाठी सरकार अनेक स्तरांवर प्रयत्न करीत असून येत्या दीड महिन्यांत देशात लस उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा मनसुख मंडावीया यांनी व्यक्त केली. यानंतर, सर्व लोक सहज लसीकरण करण्यास सक्षम असतील. 

लसीचा तुटवडा दूर करण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. परदेशात आणि परदेशी कंपन्यांकडूनही लसींचे उत्पादन उत्पादन सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. परराष्ट्र मंत्रालय या कंपन्यांशी चर्चा करीत आहे.

Read More