Marathi News> भारत
Advertisement

भाजपचं आता 'मिशन बंगाल', पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांमध्ये बंगालच्या विजयासाठी देखील उत्साह भरला.

भाजपचं आता 'मिशन बंगाल', पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह

नवी दिल्ली : बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला आहे आणि भारतीय जनता पक्ष एनडीएमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष झाला आहे. या विजयाचा उत्सव पाटणा ते दिल्ली पर्यंत साजरा करण्यात आला. पण त्याच सेलिब्रेशन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांमध्ये बंगालच्या विजयासाठी देखील उत्साह भरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुणाचेही नाव घेतले नाही, परंतु बिहारमधील एनडीए आणि भाजपच्या विजयाची झलक दाखविल्याने कार्यकर्त्यांना दिशा मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या विजयाबद्दल पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यानंतर त्यांचं धाडस बंगालमध्ये पोहोचवले.
 
जनता जनार्दन यांना निवडणुकीच्या लढाईचा मुख्य सूत्रधार बनवून पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल निवडणुकीचा बिगुल वाजविला. पाटण्यातील विजयाच्या उत्सवाची नुकतीच सुरुवात झाली होती की, पंतप्रधान मोदींनी बिहारपासून 550 किलोमीटर दूर असलेल्या कोलकात्याच्या विजयाचे लक्ष्य ठेवले.

पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. टीएमसीच्या ममता बॅनर्जी यांचं दहा वर्षांपासून येथे सरकार आहे. ममतांनी कम्युनिस्टांकडून सत्ता खेचली. त्यानंतर आता भाजपला येथे कमळ फूसवायचं आहे.

मतांसाठी बंगालमध्ये रक्त सांडले जात आहे काय? पंतप्रधान मोदींनी नाव न घेता टीका केली. बंगालमध्ये भाजपसाठी राजकीय हिंसा ही सर्वात मोठी समस्या असल्याचे स्पष्ट झाले.

बंगाल निवडणुकीतील संघर्ष मोठा आहे. बिहारची निवडणूक जिंकून भाजपचा आत्मविश्वास कोलकातापर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे, बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरु आहे. अलीपूरद्वारमध्ये बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला झाला.

एका आठवड्यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांच्या बंगाल दौर्‍यानेही राजकीय वातावरण तापले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेएनयूमध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण केले असले तरी त्याची राजकीय चिन्हे बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या दिशेने जात आहेत.

भाजपाचे ध्येय

पुढील वर्षी बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने 200 जागा जिंकून ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथून टाकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ममता बॅनर्जी यांना घेराव घालण्यासाठी भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी चक्रव्यूह तयार केला आहे.
 
अमित शहा यांचा राजकीय संदेश अगदी स्पष्ट आहे. या संदेशासह अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांसह बैठकीत मिशन बंगालचे लक्ष्य निश्चित केले. भाजपने 2021 मध्ये 294 पैकी 200 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ममता बॅनर्जीही यावेळी अमित शहा यांच्या दाव्याला गंभीरपणे घेत आहेत. कारण असे आहे की अमित शहा यांनी मागील वेळी लक्ष्य निश्चित केले होते आणि जवळजवळ समान यश भाजपला प्राप्त झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी बंगालमधील 42 पैकी 22 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. निकालात भाजपाने 18 जागा जिंकल्या होत्या. तर टीएमसीला 22 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या.

बंगाल निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभा आहे. भाजप आणि टीएमसीमधील संघर्ष वाढत आहे. अशा परिस्थितीत 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read More