Marathi News> भारत
Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश

जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती.

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठं यश

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये झालेली निवडणूक ही महत्त्वाची मानली जात होती. कारण मोदी सरकारने कलम 370 आणि 35 ए हटवल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. काहींनी राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे मोठे षडयंत्र रचले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील हे पाहायला मिळेल. जम्मू-काश्मीरमधील पहिल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात बुधवारी दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यातील एकूण 280 जागांपैकी 277 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की काश्मीरचे राजकीय वातावरण आता पूर्णपणे बदलले आहे. महत्त्वाचं म्हणजे 277 पैकी 76 जागा भाजपने जिंकल्या आहेत.

सरकारी आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्सने 67, अपक्ष 49, पीडीपी 27, काँग्रेस 26, जेकेएपी 12, जेकेपीसी 8, सीपीआयएम 5, जेकेपीएम 3, जेकेएनपीपी 2 आणि पीडीएफ 2 आणि बसपाला एक जागा मिळाली आहे. दहशतवाद आणि हवामानाचे आव्हान असूनही मतदारांचा उत्साह आणि लोकशाहीबाबत असलेला विश्वास लोकांनी दाखवला. नवीन जम्मू-काश्मीर आता विकासासाठी प्रयत्नशील आहे. 

कडक सुरक्षेत मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व २० जिल्ह्यांमध्ये मतमोजणीस प्रारंभ झाला, जो बुधवारी दुसर्‍या दिवशीही सुरू राहिला आणि केवळ तीन जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे.

पक्षाचे नाव  -  जागा  -  मतदान

भाजप         76         4,87,364

नॅशनल काँफ्रेंस  67     2,82,514

अपक्ष         49      1,71,420

पीडीपी        27       55789

काँग्रेस        26       139382 

जेकेएपी       12       38147

जेकेपीसी       8        43274

सीपीआइएम    5        6407

जेकेपीएम      3        6754

जेकेएनपीपी     2       12137

पीडीएफ       2         7273

बीएसपी       1        7397

Read More