Marathi News> भारत
Advertisement

विजय घाटावर बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक

भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

विजय घाटावर बनणार अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. ११ जूनपासून अटल बिहारी वाजपेयी एम्स रुग्णालयात होते. पण मागच्या ४८ तासांपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली होती. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारपासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली.

अटलजींच पार्थिव उद्या सकाळी भाजपा मुख्य कार्यालयात आणण्यात येणार आहे. उद्या संध्याकाळी ५ वाजता विजय घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विजय घाटावरच अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मारक बनवण्यात येणार आहे. अटलजींच्या स्मारकासाठी विजय घाटावर दीड एकर जमीन देण्यात आली आहे. एमसीडी आयुक्तांनी विजय घाटाची पाहणी केली. 

Read More