Marathi News> भारत
Advertisement

कृषी योजनांसाठी अमित शहांचा महत्वाची घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे की सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकारी बँकांचे ग्राहक लवकरच थेट लाभ हस्तांतरण (DBT) शी जोडले जातील. म्हणजेच आता त्यांनाही सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे

कृषी योजनांसाठी अमित शहांचा महत्वाची घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Cooperative Banks Update: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मोठी घोषणा केली आहे की सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सहकारी बँकांचे ग्राहक लवकरच थेट लाभ हस्तांतरण (DBT) शी जोडले जातील. म्हणजेच आता त्यांनाही सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

Cooperative Banks Update: 

आता सहकारी बँकेच्या ग्राहकांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकार सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफर (DBT) शी जोडणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात संबोधित करताना ही माहिती दिली. सध्या सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला जात आहे, म्हणजेच आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळणार आहे.

अमित शाह यांनी दिली माहिती

बँकिंग क्षेत्रात पूर्वीपेक्षा खूप सुधारणा झाली असून त्यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत असल्याची माहितीही अमित शहा यांनी दिली. याशिवाय जन धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. अशा 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभही मिळाला आहे.अमित शाह म्हणाले की, हे सर्व पीएम मोदींच्या 'सहकार से समृद्धी का संकल्प'मुळे घडले आहे.

अमित शाह म्हणाले, 'देशाच्या समृद्धी आणि आर्थिक उन्नतीमध्ये सहकार क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. पीएम जन धन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या कोट्यवधी नवीन खात्यांचे डिजिटल व्यवहारही एक ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहेत. 2017-18 च्या डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत यामध्ये 50 पटीने वाढ झाली आहे. DBT सह सहकारी बँका जोडल्या गेल्याने नागरिकांशी अधिक संपर्क वाढेल आणि सहकार क्षेत्र बळकट होईल.

आता कर्ज घेणे स्वस्त

आरबीआय आणि नाबार्डने बँकिंगसाठी जे पॅरामीटर्स बनवले आहेत त्या सर्व बाबींवर कृषी बँकेने स्वतःला सिद्ध केले आहे, असे अमित शहा म्हणाले. यापूर्वी बँकेकडून 12 ते 15 टक्के व्याजाने कर्ज मिळत होते, ते आता 10 टक्क्यांवर आले आहे. इतकेच नव्हे तर कर्जाची परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना दोन टक्के सवलतही दिली जाते.

Read More