Marathi News> हेल्थ
Advertisement

सूर्यग्रहण 2018 - ग्रहणाबाबातचे समज - गैरसमज

शुक्रवारी, 13 जुलै 2018 रोजी यंदाचं दुसरं सूर्यग्रहण आहे. 

सूर्यग्रहण 2018 - ग्रहणाबाबातचे समज - गैरसमज

मुंबई : शुक्रवारी, 13 जुलै 2018 रोजी यंदाचं दुसरं सूर्यग्रहण आहे. 13 तारीख आणि शुक्रवार हा संयोग अनेक संस्कृतींमध्ये 'खराब' किंवा 'नकारात्मक' समजले जाते. त्यामुळे या सूर्यग्रहणाबद्दल अनेकांच्या मनात समजगैरसमज आहेत. 13 तारीख आणि शुक्रवार अशा दोन्ही गोष्टींसोबत ग्रहण सुमारे 44 वर्षांपूर्वी झाले होते. 

कधी आहे सूर्यग्रहण 2018 

शुक्रवारी सूर्यग्रहण सुमारे 2 तास 25 मिनिटं चालणार आहे. हे सूर्यग्रहण सकाळी 7 वाजता सुरू होणार असून 9 वाजून 44  मिनिटांनी संपणार आहे. ग्रहणाचा वेधकाळ हा सुमारे 12 तास आधीपासून सुरू होणार आहे. 

भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, तस्मानिया, अंटार्क्टिकाच्या उत्तर भागात, प्रशांत आणि हिंद महासागरामध्ये 
दिसणार आहे. ग्रहण ही नैसर्गिक परिस्थिती असली तरीही त्याचा अनेकजण धर्म-अधर्माशी संबंध लावतात. परिणामी समाजात अनेक समज गैरसमज पसरले आहेत. मग तुमच्याही मनात अशा गोष्टी असतील तर त्यामागील वैज्ञानिक आधारदेखील जाणून घ्या.  

अन्न बनवणं टाळणे - 

ग्रहणादरम्यान ब्लू रेडीएशन्स पृथ्वीपर्यंत पोहचत नाहीत. परिणामी अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरियाची वाढ अधिक वेगाने होते. यामधून फूड इंफेक्शन होण्याची शक्यता वाढते. म्हणून ग्रहणादरम्यान अन्न न शिजवण्याचा तसेच साठवलेले अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो.

ग्रहणानंतर आंघोळ करावी -

सूर्यग्रहणानंतर आंघोळ करण्याची प्रथा ही राहूच्या अपवित्र आणि वक्रदृष्टीपेक्षा वातावरणात वाढलेल्या विषारी घटकांपासून आपला बचाव करावा याकरीता आहे. त्यामुळे अपुर्‍या सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवर वाढणार्‍या बॅक्टेरियाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये असे तुम्हांला वाटत असेल तर आंघोळ करा. 

ग्रहणाच्या काळात गरोदर स्त्रीने बाहेर पडू नये -

ग्रहण ही एक नैसर्गिक आणि अटळ गोष्ट  आहे. त्याचा बाळाच्या आरोग्यावर किंवा व्यंग निर्माण होण्याशी काहीही संबंध नसतो. मात्र बॅक्टेरियाचा वाढवा प्रभाव पाहता गर्भवती स्त्रियांबरोबरच इतरांनी देखील ग्रहण थेट डोळ्यांनी बघू नये तसेच काळजी घ्यावी.  

पाण्यात आणि जेवणावर दूर्वा घालणं  - 

दुर्वा ही एक पवित्र वनस्पती आहे. मात्र त्यासोबतच त्यातील गुणकारी क्षमता बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात. ग्रहणादरम्यान अपुर्‍या सूर्यप्रकाशामुळे अन्न लवकर दूषित होते. त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी आंबवलेल्या पदार्थांवर आणि पाण्यात दुर्वा पसरून ठेवल्या जातात.

उपवास करावा -

ग्रहणाच्या काळात गरोदर स्त्रियांप्रमाणेच इतरांनादेखील मंत्रपाठ किंवा जप करण्याचा सल्ला दिला जातो. यामागील कारण म्हणजे ग्रहणादरम्यान ग्राव्हिटी वेव्हज (लहरी) वातावरणात काही घातक बदल करण्यास कारणीभूत ठरतात. त्यांचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी घरी बसण्याचा आणि काही न खाता राहण्याचा सल्ला दिला जातो.

Read More