Marathi News> हेल्थ
Advertisement

Eye Care: तुमच्या डोळ्यातून ही सारखं पाणी येतं का? तर ही गोष्ट केली पाहिजे

सुमारे 80% लोक संगणक आणि लॅपटॉप वापरतात आणि संगणकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात.

Eye Care: तुमच्या डोळ्यातून ही सारखं पाणी येतं का? तर ही गोष्ट केली पाहिजे

आज लाखो लोक दैनंदिन गरज म्हणून संगणक, टॅबलेट आणि स्मार्टफोन वापरतात. डोळ्यांचा थकवा, अस्पष्ट दृष्टी, डोकेदुखी, कोरडे डोळे आणि डोळ्यांचा ताण यासारखी इतर अनेक लक्षणे संगणकाची स्क्रीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरामुळे दिसून येते. सुमारे 80% लोक संगणक आणि लॅपटॉप वापरतात आणि संगणकामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम (सीव्हीएस) म्हणतात. या समस्या टाळण्यासाठी, ग्रेटर नोएडाच्या शारदा हॉस्पिटलच्या नेत्ररोग तज्ञ डॉ.अदिती शर्मा यांनी 20:20:20 नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.

डोळ्यांसाठी 20:20:20 नियम काय आहे?

नेत्ररोग तज्ञ डॉ. शर्मा यांनी म्हटलं की, 20:20:20 नियम पाळावा. या नियमानुसार, आपण प्रत्येक 20 मिनिटांनंतर 20 सेकंदांसाठी किमान 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे पहावे. हे डोळ्याच्या स्नायूंवर जास्त ताण टाळते.

डोळ्यांच्या समस्येच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जर आपण आपल्या आहाराकडे लक्ष दिले आणि सकाळी उठून चालणे, योगा करणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे यावर लक्ष दिलं तर ही समस्या शक्य तितक्या लवकर टाळता येऊ शकते.

डोळ्यात जडपणा आणि अस्पष्ट दृष्टी
लाल आणि डोळ्यात पाणी येणे
डोळे खाजणे
रंग अस्पष्ट दिसणे
सतत डोकेदुखी आणि थकवा

डोळ्यात पाणी येत असेल तर काय करावे?
जर तुमच्या डोळ्यांतून सतत पाणी येत असेल आणि त्याच वेळी थोडी सूज आली असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे डोळे त्वरित कॉम्प्रेस करावेत. यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कापड घ्यावे लागेल आणि त्याचवेळी ते कोमट पाण्यात हलके भिजवून त्यावर लावावे लागेल. तसेच, आपल्याला चिडचिड आणि खाज वगैरे टाळण्यासाठी पुन्हा पुन्हा डोळे धुवावे लागणार नाहीत. दिवसातून फक्त 2 वेळा डोळे थंड पाण्याने धुवा.

डोळ्यात जडपणा का जाणवतो?
रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब वाढल्यामुळे डोळ्यांवर दबाव वाढतो. ज्यामुळे जडपणा जाणवतो आणि हा जडपणा नंतर काचबिंदू बनतो. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास त्या व्यक्तीला अंधत्व येऊ शकतं. 40 वर्षांनंतर, ही समस्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. डोळ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी भाजीचे सूप खूप फायदेशीर आहे.

ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय?

ही एक समस्या आहे ज्यामुळे डोळ्यात पुरेसे अश्रू निर्माण होत नाहीत, ही समस्या दीर्घकाळ मोबाईल लॅपटॉप वापरण्यामुळे उद्भवते. 

मुलांची विशेष काळजी घ्या
मुलांमध्ये डोळ्यांची अॅलर्जी काही कॉस्मेटिक उत्पादनांमुळ होऊ शकते, ज्याचा वापर डोळ्यांतील कोरडेपणावर केला जातो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही औषध टाकू नका आणि धूळ, घाण टाळा.

Read More