Marathi News> हेल्थ
Advertisement

दही खाल्ल्यानंतरही 'या' 4 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

जसे आपण सर्व जाणतो की दही हा थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.

दही खाल्ल्यानंतरही 'या' 4 गोष्टी कधीही खाऊ नका, नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम

मुंबई : अनेक लोकांसाठी जेवणात दही खाण्याची सवय असते. असे म्हणतात की दही जेवणाची चव वाढवते, परंतु चवीलाच नाही तर दह्याचे सेवन आरोग्याला अनेक समस्यांपासून वाचवू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की, दह्यानंतर काही गोष्टींचे सेवन केल्यास शरीरात अॅलर्जी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. होय, आजचा लेख याच विषयावर आहे. आज तुमच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत की, दही खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये आणि त्यामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते.

जसे आपण सर्व जाणतो की दही हा थंड पदार्थ आहे. अशा परिस्थितीत दह्यानंतर गरम वस्तूंचे सेवन करू नये. त्यामुळे शरीरात सर्दी तसेच आणि उष्णतेची समस्या उद्भवू शकते.

अनेक लोक दही तळलेल्या पदार्थांसोबत खातात, परंतु हे लक्षात घ्या की, दह्यानंतर किंवा त्याच्यासोबत तळलेले पदार्थ खाऊ नयेत. जर एखाद्या व्यक्तीने दह्यानंतर तळलेले पदार्थ खाल्ले तर ते आरोग्याला अनेक हानी पोहोचवू शकतात, तसेच पचनाच्या गतीवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो.

दह्यासोबत कांदा कधीही खाऊ नये. दही खाल्ल्यानंतर सलाड म्हणून लोक कांद्याचे सेवन करतात किंवा अनेक लोक दह्यात कांदा टाकून खातात. परंतु असे केल्याने लोकांना ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे लोकांना पोटाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकते.

तसेच दह्यानंतर लोणच्याचेही सेवन करू नये. यामुळे व्यक्तीच्या शरीराची प्रतिक्रिया खराब होऊ शकते.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More