Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून लग्नापूर्वी लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये नव्हते 'दीप-वीर'

दीपिकाकडूनच महत्त्वाचा खुलासा 

...म्हणून लग्नापूर्वी लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये नव्हते 'दीप-वीर'

मुंबई : 'दीप- वीर' म्हणून चाहत्यांच्या वर्तुळात आणि संपूर्ण कलाविश्वातच ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्तानेच पुन्हा एकदा या खास सेलिब्रिटी जोडीच्या तितक्याच खास विवाहसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

माध्यमांपासून काही गोष्टी लपवत, मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत आयुष्यभराची साथ निभावण्याची वचनं देत इटलीतील लेक कोमो येथे दीपिका आणि रणवीरने लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी आणि त्यानंतरही विविध कार्यक्रमांना असणारी त्यांची एकत्र उपस्थिती, एकमेकांप्रती त्यांच्याकडून केली जाणारी वक्तव्य सारं सारं काही प्रेक्षकांचं लक्ष वेधत होतं. 

जवळपास सहा वर्षे दीपिका आणि रणवीर रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान त्यांच्या नात्यात चढ- उतार, अफवांची वादळं आली. पण, त्यांची एकमेकांना असणारी साथ मात्र कायम राहिली. या साऱ्या प्रवासामध्ये लग्नाच्या आधी मात्र ही जोडी लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये मात्र राहिली नव्हती. ज्यामागचं कारण आता खुद्द दीपिका पदुकोणनेच एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'हार्पर्स बझार युएस'ला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने काही गोष्टींचा उलगडा केला. 'आम्ही लग्नाच्या आधीच एकत्र राहण्यास सुरुवात केली असती तर, पुढे काहीतरी नवं जाणून घेण्यासाठी किंवा नात्याला नव्या बहरण्यासाठी उरलंच काय असतं? हे एक वर्ष अशाच साऱ्या गोष्टींचं होतं. एकत्र राहणं, एकमेकांना ओळखण....', असं दीपिका म्हणाली. 

आपण, हा (लग्नाचा) जो निर्णय घेतला तो जीवनातील सर्वोत्तम निर्णय ठरल्याचंही ती म्हणाली. लग्नसंस्थेविषयी काही व्यक्तींचे फारच वेगळे विचार असल्याचं म्हणत आम्ही मात्र या संस्कृतीवर, पूर्ण विश्वास ठेवतो आणि त्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटतो, असंही दीपिकाने या मुलाखतीत स्पष्ट केलं. एकंदरच काय, तर 'दीप- वीर'ला खऱ्या अर्थाने बी- टाऊनचं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं का म्हटलं जातं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. 

Read More