दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दुबईमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
कार्डिएक अरेस्टमुळे अचानक त्यांचं निधन झालं. श्रीदेवी बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी संपूर्ण कुटुंबियांसोबत त्या दुबईमध्ये होत्या.
श्रीदेवी यांचं पार्थिव शरीर आज भारतात आणलं जाणार आहे. श्रीदेवी विजिट वीजावर दुबईला गेल्या होत्या. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी 3 दिवस लागतात. पण भारतीय दूतावास श्रीदेवी यांचं पार्थिव आजच भारतात पोहोचवण्याची प्रयत्न करत आहे.
दुबईमधील भारतीय दुतावास नवदीप सूरी यांनी माहिती दिली की, भारत त्यांचं पार्थिव लवकरात लवकर भारतात नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुबईमध्ये राजदूत स्थानिक प्रशासनसोबत चर्चा करुन शक्य तेवढी मदत केली जात आहे.
Absolutely shocked to get the report about untimely demise of #Sridevi
— IndAmbUAE (@navdeepsuri) February 25, 2018
Conveyed my condolences to the family.
Our consulate in Dubai is working with local authorities to provide all possible assistance.