Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिश्मा कपूरला दुसऱ्या लग्नाबद्दल काय वाटतं?

काय करणार करिश्मा 

करिश्मा कपूरला दुसऱ्या लग्नाबद्दल काय वाटतं?

मुंबई : हल्लीच बातमी आली होती की, करिश्मा कपूरचा घटस्फोटीत नवरा संजय कपूर तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. संजय कपूरची तिसरी बायको प्रिया सचदेवा आई होणार आहे. याची चर्चा होत असतानाच करिश्मा कपूरची एक शॉकिंग माहिती समोर आली आहे. करिश्मा कपूर संजय कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बिझनेसमन संदीप तोशनीवाल यांना डेट करत होती. लवकरच हे दोघं लग्न करणार आहेत अशी देखील चर्चा होती. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर आणि संदीप यांनी ब्रेकअप केलं आहे. या दोघांनी सहमताने हा निर्णय घेतला आहे. याचं कारण आहे करिश्मा आता सध्या तरी दुसऱ्या लग्नाच्या मूडमध्ये अजिबातच नाही. तिला फक्त आपल्या मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यायचं आहे. 

संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्माकडे दोन्ही मुलांची जबाबदारी आली आहे. संदीपने देखील या गोष्टीला मान्य करून दुरावा निर्माण केला आहे. गेल्या वर्षी रणधीर कपूरला करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी ती सध्या इंटरेस्टेड नसल्याचं सांगितलं. 

रणधीर यांनी सांगितलं की, सध्या करिश्माचा दुसरं लग्न करण्याचा मूड नाही. मला स्वतःला वाटतं की तिने लग्न करावं पण तिला आपलं कुटुंब सुरू करायचं नाही. तिला फक्त आपल्या मुलांवर म्हणजे समायरा आणि कियानवर लक्ष द्यायचं आहे. 

Read More