Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानने विचारला थेट लग्नाचा प्रश्न! मल्लिकाचं उत्तर ऐकून म्हणाला, 'खोटारडी...'

Salman Khan On Wedding Question : सलमान खाननं लग्नाविषयी विचारला होता हा थेट प्रश्न

सलमान खानने विचारला थेट लग्नाचा प्रश्न! मल्लिकाचं उत्तर ऐकून म्हणाला, 'खोटारडी...'

Salman Khan On Wedding Question : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या लग्नाचा प्रश्न हा नेहमीच पाहायला मिळतो. त्यावर आजही चर्चा ही होतेच. आजही त्याच्याशी लग्न करायला त्याच्या अनेक चाहत्या या तयार आहेत.  मात्र, सलमान काही लग्नासाठी तयार होत नाही. इतकंच नाही तर सलमान खानचे मित्र अर्थात सेलिब्रिटी देखील त्याची यावरून मस्करी करताना दिसतात. सलमान लग्न कधी करणार याच उत्तर आजवर कोणाला मिळालं नसलं तरी तो लग्नाच्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत असतो. 

सोशल मीडियावर त्याची एक क्लिप व्हायरल झाली होती. हा व्हिडीओ त्याच्या 'दस का दम 2' या त्याच्या शोमधील होता. 15 वर्षांपूर्वी सलमान खान या शोचं सुत्रसंचालन करत होता. या शोमध्ये मल्लिका शेरावतनं हजेरी लावली होती. सलमान खाननं अभिनेत्रीला एक मजेशीर प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर काय मिळालं ते जाणून घेऊया...

काय म्हणाला होता सलमान खान, सलमान खान म्हणाला की 'मी अनेकदा हे पाहिलं आहे की खूप सुंदर ज्या मुली असतात त्या अॅव्हरेज दिसणाऱ्या मुलांशी लग्न करतात, किंवा त्यांचा बॉयफ्रेंड हा अॅव्हरेज दिसणार असतो. असं का? त्यावर उत्तर देत मल्लिकानं उत्तर दिलं. 'कारण दिसणं इतकं महत्त्वाचं नसतं. मन जास्त महत्त्वाचं असतं. पुरुषात किती समजुतदारपणा आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. कारण दिसणं हे काय शेवट पर्यंत राहत नाही.'  मल्लिकांन दिलेलं हे उत्तर तिथे उपस्थित असलेल्या मुलींना देखील पटलं. हे पाहून सलमान देखील हैरान झाला. 

हे ऐकताच सलमान खान म्हणाला, 'इतकं खोटं एकत्र. महिलांचे विचार हे कमालीचे असतात. त्याच्याकडे लूक्स नाहीत, पैसा नाही आणि काहीच नाही असं सलमान म्हणाला.' त्यानंतर सलमान पुढे म्हणाला, एकतर तू देवी आहेस किंवा मग खोटारडी आहेस. हे ऐकून मल्लिकानं हसत सांगितलं की नाही त्याच्याकडे कॅरेक्टर असणं गरजेच आहे. 

हेही वाचा : सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?

दरम्यान, सलमान खानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच सिकंदर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग फिल्मसिटीमध्ये सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए आर मुरुगदास करत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे. तर ‘बाहुबली’ फेम सत्यराज देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

Read More