Marathi News> मनोरंजन
Advertisement

रजनीकांत यांनी लग्नात धनुषला दिलेली ही खास गोष्ट घटस्फोटानंतरही ठेवतो आपल्या जवळ

धनुषने 18 वर्षांचं नातं संपवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

रजनीकांत यांनी लग्नात धनुषला दिलेली ही खास गोष्ट घटस्फोटानंतरही ठेवतो आपल्या जवळ

मुंबई : तमिळ चित्रपटांचा लोकप्रिय अभिनेता, धनुषने 18 वर्षांचं नातं संपवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. धनुषने 2004 मध्ये रजनीकांत यांची लाडकी मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं. त्यांचं लग्न साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होतं. रजनीकांत यांच्या मुलीचं लग्न प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानाचा भाग बनलं होतं. मात्र आता हे नातं कायमचं तुटले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की, धनुषकडे आपल्या मुलीचा हात देण्यापूर्वी रजनीकांतने त्याला एक खास भेट दिली होती. 

रजनीकांत त्याच्या एक्स जावयासोबत पिता-पुत्राचं नातं मानतात. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आहेत. 18 वर्षांच्या वैवाहिक नात्यात धनुष देखील रजनीकांतच्या कुटुंबाचा एक भाग बनला. अशा परिस्थितीत रजनीकांत नेहमी त्यांच्या जावईच्या पाठीशी उभे राहिले. धनुष महादेवाचे खूप मोठा भक्त आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. 

अशा परिस्थितीत रजनीकांत यांनी लग्नाची भेट म्हणून धनुषसाठी हिमालयातून रुद्राक्ष नेकबँड मागवला होता. आणि त्याला भेट म्हणून दिला होता. यासोबतच धनुषनेही रजनीकांतची ही खास भेट नेहमी परिधान केली होती. शूटिंगदरम्यानच तो ही माला काढायचा.

या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या क्यूट कपल्सच्या यादीत सामील झाली होती. मात्र अचानक झालेल्या या घटस्फोटाच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. धनुषने एक पोस्ट शेअर करून ही बातमी दिली. धनुषने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 18 वर्षांचा सहवास... मित्र म्हणून, जोडपं म्हणून, पालक म्हणून. शुभचिंतक म्हणून. 

हा प्रवास पुढे जाण्याचा, समजून घेण्याचा, जुळवून घेण्याचा आणि एकत्र स्वीकारण्याचा होता....आज आपण अशा ठिकाणी उभे आहोत जिथे आपले मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या आणि मी कपल म्हणून वेगळें होण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता आम्ही एक व्यक्ती म्हणून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ देऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला ते हाताळण्यासाठी गोपनीयता द्या. ओम नम: शिवाय...

Read More