Marathi News> मनोरंजन
Advertisement

आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च

Salmaan Khan : बॉलिवूड हे असं विश्व आहे. जेथे अनेक तऱ्हेचे आणि विविध प्रकारच्या भुमिका करणारे अभिनेते आहेत ज्यांचा एक स्वतंत्र फॅन बेस आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा ही रंगलेली असते. यावेळीही अशाच काही बॉलिवूड अभिनेत्यांची चर्चा रंगलेली आहे. 

आमिर, शाहरूख, अक्षयला विसरा; कारण 100 कोटी कमावलेल्या सर्वाधिक चित्रपटांचा एकटा मालक 'हा'च

Salmaan Khan : सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असते ती म्हणजे कोणता अभिनेता किती पैसे कमावतो याची. 100 करोड क्लबमध्ये आपला चित्रपट येणं हीच खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे अशाच चित्रपटांची ही सतत चर्चा रंगलेली असते. या चित्रपटांसोबत चर्चा असते ती म्हणजे या चित्रपटांच्या अभिनेत्यांची. सध्या चर्चा आहे अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची ज्याच्या नावावरच 100 कोटींचे चित्रपट आहेत. यामध्ये ना शाहरूख खानचं नावं आहे ना अक्षय कुमार ना आमिर खान. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका लोकप्रिय अभिनेत्याची ज्यानं आपल्या हटके आणि अतरंगी स्टाईलनं सर्वांचीच मनं ही जिंकून घेतली आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे सलमान खान. सलमान खान हा असा एकमेव अभिनेता आहे ज्यानं आपल्या कारकीर्दीत सर्वाधिक चित्रपटांची कमाई केली आहे. त्याचे सर्वाधित चित्रपट हे 100 कोटींचा गल्ला भरणारे आहेत. 

गेली 30 एक वर्षे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक वर्चस्व हे कोणाचे असेल तर ते म्हणजे शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचे. सर्व मंडळींनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयानं गेली 30 वर्षे राज्य केले आहे. आज मोठमोठे कलाकार येतायत आणि घडतंही आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहयला मिळते. परंतु या खान मंडळींची क्रेझ मात्र काही केल्या कमी होत नाहीये. या सगळ्यांची क्रेझ आजही कायम आहे. त्यातून यात सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे शाहरूख खान आणि सलमान खान यांची. याच्यातही जोरात स्पर्धा ही पाहायला मिळते परंतु हे सर्व अभिनेते एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. त्यातून ते एकमेकांच्या कामाची प्रशंसाही करताना दिसतात. 

हेही वाचा : आपल्याकडेही असं एक घर असतं, तर... अक्षय कुमारच्या घराकडे पाहून तुम्ही काय म्हणाल?

रिपोर्टनुसार आतापर्यंत आता गेली 13 वर्षे अभिनेता सलमान खान आपल्या चित्रपटांना 100 करोड कल्बमध्ये घेऊन जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यानं सर्वाधिक चित्रपटांमध्ये लीड अभिनेता म्हणून अभिनय केला आहे. ज्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होती. 

आत्तापर्यंत त्याच्या नावावर अशा 16 फिल्म्स आहेत. तर अक्षय कुमारच्या नावावर 15, अजय देवगणकडे 12, शाहरूख खानकडे 8 अशी ंंसंख्या आहे. 

Read More