Marathi News> मनोरंजन
Advertisement

Miss India Aishwarya Rai Bachchan देखील आली होती ED च्या रडारवर, पाहा काय होतं प्रकरण

तीच्याशी संबंधित अशी बातमी समोर आली, ज्यामुळे बच्चन कुटुंबाची बरीच बदनामी झाली...

Miss India Aishwarya Rai Bachchan देखील आली होती ED च्या रडारवर, पाहा काय होतं प्रकरण

Aishwarya Rai Bachchan caught by police: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी मिस इंडिया आणि कमालीचं सौन्दर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे Aishwarya Rai Bachchan.. ऐश्वर्या हिने अभिषेख बच्चन सोबत लग्न केल्यानंतर बच्चन कुटुंबीयांची ती सूनबाई झाली . आराध्या बच्चनच्या जन्मानंतर ऐश्वर्या बच्चनने बोलीवूडमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या रणबीर कपूरसोबत 'ए दिल है मुश्किल' या चित्रपटात दिसली होती.

अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्यानंतर ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत काम करणे बंद केले. आता तिने चित्रपटसृष्टीला पूर्णपणे निरोप दिला आहे.

अभिनेत्रीबद्दल रोज नवनवीन बातम्या समोर येत असतात. पण एकदा तीच्याशी संबंधित अशी बातमी समोर आली, ज्यामुळे बच्चन कुटुंबियाला मनस्ताप सहन करायला लागला होता. ऐश्वर्या रायला एकदा ईडीने समन्स बजावले होते. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने या अभिनेत्रीला दिल्लीतील कार्यालयात बोलावले होते.

पनामा पेपर्स लीकमध्ये केवळ ऐश्वर्याच नाही तर  बिग बी अमिताभ बच्चन यांचं नावसुद्धा समोर आलं होत. पनामा पेपर्स लीक प्रकरणात मोसॅक फोन्सेका या कंपनीची काही कायदेशीर कागदपत्रे लीक झाली होती आणि त्यातून बऱ्याच मोठ्या व्यक्तींची नाव समोर आली होती.

ज्यात देशातील मोठमोठे उद्योगपती राजकारणी आणि सेलिब्रिटींची नाव होती. ऐश्वर्याबद्दल बातमी आली होती की ती एका परदेशी कंपनीची डायरेक्टर आणि शेअरहोल्डर होती. तर तीचे वडील, आई आणि भाऊ कंपनीत तिचे भागीदार होते. या प्रकरणाची बरीच चर्चा  झाली होती आणि त्याचा फटका बच्चन कुटुंबियांच्या नावाला बसला होता.

Read More