Marathi News> मनोरंजन
Advertisement

लालसिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने सोडला अभिनय? अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

 आमिर खानने त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल सांगितलं आणि यादरम्यान अभिनेत्याने सांगितलं की तो अभिनयातून...

लालसिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने सोडला अभिनय? अभिनेत्याच्या वक्तव्यानंतर एकच खळबळ

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान अभिनयातून ब्रेक घेत आहे. लाल सिंह चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर, अभिनेता दीर्घकाळानंतर दिल्लीच्या कार्यक्रमात दिसला. यावेळी आमिर खानचा एकदम वेगळा लूक पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान आमिर खानने त्याच्या भविष्यातील प्लॅनबद्दल सांगितलं आणि यादरम्यान अभिनेत्याने सांगितलं की तो काही काळ अभिनयातून ब्रेक घेत आहे.

आमिर खान अभिनयातून ब्रेक घेत आहे
आमिर खानने निमंत्रणपत्रिकेत म्हटलं आहे की, मी जेव्हा अभिनेता म्हणून एखादा चित्रपट करतो तेव्हा मी त्यात इतका हरवून जातो की मला माझ्या आयुष्यात दुसरं काहीच दिसत नाही. लाल सिंग चड्ढा नंतर मला चॅम्पियन्स चित्रपट करायचा होता. चित्रपटाची कथा अप्रतिम आणि सुंदर आहे. पण मला वाटतं की मी थोडा ब्रेक घ्यावा. मला माझं कुटुंब आणि मुलांसोबत राहायचं आहे.

35 वर्षांनी ब्रेक घेणार
आमिर पुढे म्हणाला की, 35 वर्षांत पहिल्यांदाच अभिनेता म्हणून ब्रेक घेणार आहे. या कार्यक्रमादरम्यान, त्याने त्याच्या 'पियान' चित्रपटाबद्दल एक मोठं अपडेट देखील दिलं आहे. आमिर खानचा पुढचा चित्रपट चॅम्पियन असेल पण तो या चित्रपटात निर्माता म्हणून आहे. या चित्रपटासाठी तो अभिनेत्याचा शोध घेणार आहे.

लाल सिंग चढ्ढा फ्लॉप ठरला होता
आमिर शेवटचा 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूरही होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याने लाल सिंह चड्ढासोबत 4 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे.

Read More