Marathi News> मनोरंजन
Advertisement

अज्याच्या पोस्टिंगमुळे भैय्यासाहेबांच फावणार का?

अज्याच्या पोस्टिंगमुळे भैय्यासाहेबांच फावणार का?

मुंबई : लागिरं झालं जी या मालिकेतील अज्या आता आपल्या कारगिल येथे पोस्टिंगसाठी रवाना झाला आहे. पण त्याच्या गावापासून लांब जाण्यामुळे भैय्यासाहेब आणि मामी यांच अधिक फावणार का? असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत आपण अनेकदा पाहिलं की, मामी, जयडी आणि भैय्यासाहेब काही ना काही कट रचून शितलीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. 

पण आता अज्याच शितलीपासून लांब असल्यामुळे यांच्या कटकारस्थानांना अधिक वाव मिळणार आहे. अज्या पोस्टिंगला जात असताना सगळ्यांचा निरोप घेत असतो. तेव्हा भैय्यासाहेब अज्याच्या कानात सांगतो की, फौजी तुम्ही देशाचं रक्षण करा आम्ही तुमच्या फॅमिलीची काळजी घेतो. यातून भैयासाहेबांना काय सांगायचं हे स्पष्ट होतं. 

अज्या आता कारगिलला रवाना झाला आहे. आता मालिकेला खरा ट्विस्ट येणार आहे. भैय्यासाहेब आणि मामी मिळून शितलीला कसा त्रास देतील. आणि शितली त्याला कसं प्रतिउत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच एपिसोड संपताना आपण पाहिलं अजून अजिंक्यला जाऊन एक दिवसही झाला नाही पण शितलीला तो विरह सहन होत नाही. 

Read More