Marathi News> मनोरंजन
Advertisement

या कारणामुळे अक्षय कुमारला राखी बांधण्याचा कतरिना कैफचा निर्णय

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांची चाहत्यांनाही केमिस्ट्री खूप आवडते.

या कारणामुळे अक्षय कुमारला राखी बांधण्याचा कतरिना कैफचा निर्णय

मुंबई : कतरिना कैफ आणि अक्षय कुमारची जोडी जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता पाहण्यासारखी असते. चाहत्यांनाही त्यांची केमिस्ट्री खूप आवडते. मात्र, ऑनस्क्रीन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारी ही जोडी एकदा भाऊ-बहिणीच्या जोडीत रूपांतरित होणार होती.

वास्तविक, बॉलिवूड स्टार्सशी संबंधित जुने किस्से किंवा व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर समोर येतात. असाच एक कतरिना कैफ आणि अक्षय कुमारचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे. जेव्हा ही जोडी कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र पोहोचली होती. या शोदरम्यान कतरिनाने खुलासा केला की, ती एकदा अक्षय कुमारला राखी बांधणार होती.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, 'द कपिल शर्मा शो' या टीव्ही शोचा होस्ट कपिल शर्मा कतरिनाला विचारत आहे, 'तीस मार खान'चे शीला की जवानी हे गाणे शूट होत असताना तू अक्षय कुमारला सांगितलं होतं का? तुला राखी बांधायची आहे. तुम्हाला राखीचा अर्थ कळला नाही की अक्षय कुमारचा निरागसपणा कळला नाही क' कपिल शर्माच्या या प्रश्नावर शोमध्ये उपस्थित प्रत्येकजण हसायला लागतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर कतरिना हसून उत्तर देते, 'मला राखीचा अर्थ नेमका माहीत होता. रक्षाबंधन म्हणजे भाऊ तुमचं पूर्ण संरक्षण करतात. अक्षय कुमार माझा खूप चांगला मित्र आहे. तो माझं अनेक ठिकाणी संरक्षण करतो. म्हणूनच मी असं बोलले.' कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांनी 'वेलकम', 'दे दना दान', 'सिंघ इज किंग' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतंच हे दोघेही 'सूर्यवंशी' चित्रपटातून 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले.

Read More